शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकमध्ये जेडीएसने केली 12 जागांची मागणी, मनधरणीसाठी काँग्रेसने केले दिग्गजांना पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 16:13 IST

कर्नाटकमध्ये आघाडी करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये आघाडी करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी जेडीएसने काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी चाली खेळण्यास सुरुवात केली असून, कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली आहे. जेडीएसबरोबर निर्माण झालेला हा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याकडे मदत मागितली आहे.  चंद्राबाबू नायडू,  शरद पवार आणि  फारुख अब्दुल्ला या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एनडीएविरोधात राष्ट्रीय आघाडी बनवण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे. आता हे तिन्ही नेते जानेवारीच्या मध्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करणार आहेत.  प्रादेशिक पक्षांनी आपण जिंकू शकतो एवढ्याच जागांची मागणी केली पाहिजे, असे टीडीपीचे प्रवक्ते कमबमपती राममोहन राव म्हणाले. कर्नाटकमध्ये आघाडीचा निर्णय झाल्यानंतर सर्वपदांचे वाटप 2:1 अशा पटीत व्हावे, असे निश्चित करण्यात आले होते. या फॉर्म्युल्यानुसार जेडीएसला कर्नाटकमध्ये एकूण दहा जागा मिळू शकतात. मात्र देवेगौडा यांनी एकूण 12 जागांसाठी आग्रह धरला आहे. तसेच देवैगौडा यांनी चिक्काबल्लूपुरा या जागेवरही दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे.  चिक्काबल्लूपुरा जागेवर सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली हे खासदार आहेत.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस