शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जदयू आमदारांचा नितीश कुमारांना घरचा आहेर; तेजस्वी यादवांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:19 IST

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या  आमदाराने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारमधील सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी काहीही काम करत नसल्याचा आरोप आमदार अमरनाथ गामी यांनी केला आहे. बिहारमध्ये नोकऱ्या नाही. त्यामुळेच लोक बिहार सोडून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या आमदाराने राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीविरुद्ध सुरू केलेल्या यात्रेचे कौतुक केले आहे.

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अन्यथा लोक बिहार सोडून गेले नसते. तेजस्वी यादव बेरोजगारी हटाव यात्रा काढत आहेत. मात्र त्यामुळे फारसा फायदा होणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय बेरोजगारी हटविणे सोपे नाही. बिहारमधील कोणत्याच सरकारने बेरोजगारी समोर ठेवून काम केले नसल्याचे गामी यांनी सांगितले आहे.

याव्यतिरिक्त जदयूचे आमदार जावेद इकबाल अन्सारी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मागील 10-15 वर्षांपासून बेरोजगारीमुळे बिहारमधून अनेकजन पलायन करत आहेत. विरोधी पक्षांकडून 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढण्यात येत आहे. लोक कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. तिथे त्यांना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे युवकांच्या प्रश्नावर मैदानात उतरणाऱ्यांचे कौतुकच करायला हवे, असं सांगताना त्यांनी राजदच्या यात्रेचे समर्थन केले आहे.

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.