शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

NDA सरकारच्या घटक पक्षातील मंत्री एका निर्णयावर नाराज, भाजपाचा पाठिंबा काढून घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:30 IST

सरकारने नीट विचार करून निर्णय घेतला नसल्याचे केले व्यक्त केले रोखठोक विधान

Jayant Chaudhary: लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. या निवडणुकीत भाजपाने ४००पार ची घोषणा दिली होती पण प्रत्यक्षात त्यांना २५०चा आकडाही गाठता आला नाही. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यासह इतर घटक पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापन झाले. सहकारी घटक पक्ष लवकरच भाजपाची साथ सोडतील आणि एनडीए सरकार लवकरच कोसळेल, असा दावा इंडिया आघाडीतील नेतेमंडळी सातत्याने करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत एका सहकारी पक्षातील एक केंद्रीय राज्यमंत्री भाजपा सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याचे दिसत आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक दल ( RLD )चे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी कावड यात्रेवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे घटक असलेल्या आरएलडीकडून जयंत चौधरी हे राज्यसभेवरील खासदार आहेत. जयंत चौधरी यांच्या विधानाचा संबंध आगामी १० विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीशी जोडला जात आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आपल्या स्थानिक राजकीय कारकीर्दाच्या दृष्टीने अशी भूमिका मांडताना दिसत आहेत, असा अंदाज बांधला जात आहे. कावड यात्रा मार्गावर असलेल्या भोजनालयांच्या मालकांची नावे त्यांच्या दुकानांवर डिस्प्ले करण्यात यावी, असा आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढला. या आदेशावर टीका करत हा आदेश मागे घेण्याची मागणी जयंत चौधरी यांनी केली आहे.

"हा आदेश काढण्याआधी सारासार विचार करण्यात आलेला दिसत नाही. मला असे वाटते की सरकार या आदेशावर ठाम आहे कारण हा निर्णय आधीच घेऊन झालेला आहे. सरकारमध्ये कधी कधी असे प्रकार घडतात. प्रत्येक जण कावड यात्रेत सेवा करण्याच्या विचाराने सहभागी होतो. कोणीही नावाने ओळखले जाण्यासाठी सहभाग घेत नाही. सरकारने हा निर्णय विचार करून घेतला नाही. पण या प्रकरणाला धर्म आणि जातीशी जोडू नये" असे ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या आदेशवर स्थगिती आणली.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी