शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 09:52 IST

समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे.

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या समाजवादी पक्षाची साथ सोडून तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 एप्रिलला जया बच्चन यांच्या राज्यसभेतील खासदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या तीन टर्म त्या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. मात्र, राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत जया बच्चन पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. आगामी काही दिवसांतच पक्षाकडून याबद्दलची औपचारिक घोषणा होईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापैकी 10 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 पैकी 312 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तर विधानसभेत झालेल्या पराभवामुळे समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. त्यामुळे या जागेवर आत्तापासूनच अनेकांचा डोळा आहे.तर दुसरीकडे तृणमुलच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे चार खासदार यंदा निवृत्त होत आहेत. त्यामुळे अनेकजणांनी खासदारकीच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आम्ही यावेळी आमच्या किमान दोन खासदारांना राज्यसभेत निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जया बच्चन यांनी ममता बॅनर्जी यांना सूचक संदेश पाठवायला सुरूवात केली होती. जया बच्चन या मूळच्या बंगाली असून त्यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अनेकदा अमिताभ बच्चनदेखील जाहीर कार्यक्रमांमध्ये आपण 'बंगालचा जावई' असल्याचा उल्लेख करतात. गेल्यावर्षी भाजपाच्या एका कार्यकर्त्याने ममता बॅनर्जी यांना ठार मारणाऱ्याला 11 लाखांचे इनाम देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जया बच्चन यांनी भाजपावर कडाडून टीका केली होती. तुम्ही गायींना वाचवू शकता, पण तुमच्या राज्यात महिलांना अत्याचारांना बळी पडावे लागत आहे, असे बच्चन यांनी म्हटले होते. यानंतरच्या काळात अमिताभ आणि जया बच्चन यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे जया बच्चन आणि ममता बॅनर्जी यांच्यातील जवळीक सातत्याने वाढत गेली. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनAmitabh Bachchanअमिताभ बच्चनMamata Banerjeeममता बॅनर्जी