शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

"आईसोबत तो ईद साजरी करायला आला होता"; ६ दिवसांसाठी मुंबईत आलेल्या जावेद खानचे कुटुंब संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:21 IST

लंडन येथून आईच्या उपचारासाठी आलेल्या जावेद अली यांच्या कुटुंबाचा अहमदाबाद विमान दुर्घटेनेत मृत्यू झाला.

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानातील २४१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक चिमुरड्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये लंडन येथे राहणारे जावेद अली यांच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. जावेद हे पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईत आले होते. सर्व कामे आटपून परतत असतानाच विमान अपघात त्यांचे संपूर्ण कुटुंब संपले.

अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या १७१ मधील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जावेद अली या एनआरआय कुटुंबाचाही समावेश होता. मूळच मुंबईचे रहिवासी असलेले जावेद अली यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. जावेद अली लंडनहून मुंबईत आले होते आणि त्यांच्या आईवर उपचार करून ते लंडनला जात होते. जावेद अली यांचे कुटुंब लंडनला परतण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईट AI-१७१ मध्ये बसले होते. पण ही त्याच्या आयुष्यातील शेवटची फ्लाईट ठरेल याची कोणालाच कल्पना नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातात जावेद अली (३७ वर्षे), त्यांची पत्नी मरियम अली (३५ वर्षे) आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. जावेदचा आठ वर्षांचा मुलगा झयान अली आणि चार वर्षांची मुलगी अमीन अली यांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. जावेद यांचे कुटुंबिय रुग्णालयामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही अजूनही आशा आहे की, ते यातू बचावले असतील.

जावेद अली ६ दिवसांसाठी भारतात आला होता. तो त्याच्या आईच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आला होता. त्याची पत्नी लंडन येथीलच होती. त्यामुळे ते तिथेच स्थायिक झाले होते. "आईसोबत ईद साजरी करण्यासाठी जावेद मुंबईत आला होता. तिच्यावर सर्व उपचार करुन तो लंडनला जाण्यासाठी निघाला होता. तीन ते चार वर्षांनी तो इथे यायचा. ११ वर्षांमध्ये कधी महत्त्वाचे काम असल्याचे तो इथे यायचा. व्हिडीओ कॉलवर त्याचे आईसोबत रोज बोलणं व्हायचं," असं जावेदच्या भावाने सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया