शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"आईसोबत तो ईद साजरी करायला आला होता"; ६ दिवसांसाठी मुंबईत आलेल्या जावेद खानचे कुटुंब संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:21 IST

लंडन येथून आईच्या उपचारासाठी आलेल्या जावेद अली यांच्या कुटुंबाचा अहमदाबाद विमान दुर्घटेनेत मृत्यू झाला.

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानातील २४१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक चिमुरड्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये लंडन येथे राहणारे जावेद अली यांच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. जावेद हे पत्नी आणि दोन मुलांसह मुंबईत आले होते. सर्व कामे आटपून परतत असतानाच विमान अपघात त्यांचे संपूर्ण कुटुंब संपले.

अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या १७१ मधील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जावेद अली या एनआरआय कुटुंबाचाही समावेश होता. मूळच मुंबईचे रहिवासी असलेले जावेद अली यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. जावेद अली लंडनहून मुंबईत आले होते आणि त्यांच्या आईवर उपचार करून ते लंडनला जात होते. जावेद अली यांचे कुटुंब लंडनला परतण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईट AI-१७१ मध्ये बसले होते. पण ही त्याच्या आयुष्यातील शेवटची फ्लाईट ठरेल याची कोणालाच कल्पना नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातात जावेद अली (३७ वर्षे), त्यांची पत्नी मरियम अली (३५ वर्षे) आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. जावेदचा आठ वर्षांचा मुलगा झयान अली आणि चार वर्षांची मुलगी अमीन अली यांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. जावेद यांचे कुटुंबिय रुग्णालयामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनाही अजूनही आशा आहे की, ते यातू बचावले असतील.

जावेद अली ६ दिवसांसाठी भारतात आला होता. तो त्याच्या आईच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आला होता. त्याची पत्नी लंडन येथीलच होती. त्यामुळे ते तिथेच स्थायिक झाले होते. "आईसोबत ईद साजरी करण्यासाठी जावेद मुंबईत आला होता. तिच्यावर सर्व उपचार करुन तो लंडनला जाण्यासाठी निघाला होता. तीन ते चार वर्षांनी तो इथे यायचा. ११ वर्षांमध्ये कधी महत्त्वाचे काम असल्याचे तो इथे यायचा. व्हिडीओ कॉलवर त्याचे आईसोबत रोज बोलणं व्हायचं," असं जावेदच्या भावाने सांगितले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया