शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

जावडेकर ठरले डार्क हॉर्स

By admin | Updated: May 27, 2014 05:19 IST

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला.

यदु जोशी, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. सगळ्या घटनाक्रमात जावडेकर डार्क हॉर्स ठरणे राज्यातील नेत्यांसाठीही अनपेक्षित होते. सकाळपर्यंत महाराष्ट्रातील भाजपाच्या सात जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे मानले जात होते. चर्चेतील नावांपैकी हंसराज अहिर, दिलीप गांधी आणि हरिश्चंद्र चव्हाण यांचा अंतिमत: समावेश झाला नाही आणि जावडेकर सर्वांना धक्का देत पुढे निघून गेले. राज्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळातील नावे मोदींनी ठरविलेली होती. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेली रावसाहेब दानवे, पीयूष गोयल यांच्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. गडकरी, मुंडेंचे नाव अर्थातच होते. मात्र, राज्यातील नेत्यांनी सुचविलेली गांधी, चव्हाण, अहिर ही नावे स्वीकारली नाहीत. उलटपक्षी जावडेकर यांचा समावेश करीत अंतिम शब्द आपलाच असेल, असा सूचक इशारा दिला. जावडेकर यांचा समावेश करीत असल्याचे त्यांनी सकाळी अन्य नेत्यांना सांगितले. जावडेकर यांची निवड आमच्यासाठी अनपेक्षित होते, असे एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. रा.स्व. संघानेही त्यांच्या समावेशासाठी आग्रह धरला, असे समजते. मेहनतीचे बक्षीस पक्षाने काही दिले अन् न दिले तरी पक्ष कार्याप्रतीची निष्ठा कमी होऊ द्यायची नाही या विचाराने कार्यरत राहिल्याने जावडेकर यांना आज मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले, असे म्हटले जाते. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर जावडेकर निराश झाले नाहीत. नंतर त्यांना ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी दिल्लीला नेले. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. पुढे ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला तेव्हा पक्षाने त्यांच्याऐवजी आपल्या कोट्यातून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठविले. आठवलेंसाठी जावडेकरांचा बळी घेतला गेला, अशी टीकाही झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी त्यांची सुरुवातीला इच्छा होती पण पक्षनेतृत्वाचा कल लक्षात घेऊन ते पुन्हा दिल्लीत सक्रिय झाले. राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत राहिले. सोबतच देशपातळीवर निवडणुकीच्या नियोजनात पक्षासाठी त्यांनी योगदान दिले. सीमांध्र आणि तेलंगणामध्ये तेलगू देसम पक्षाशी भाजपाची युती होण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. ही युती तुटणार की काय, असा पेच निर्माण झाला होता; पण जावडेकर यांनी खुबीने तो टाळला. भाजपामध्ये ते नेहमीच लो प्रोफाईल राहिले. या सगळ्या बाबींचे बक्षीस त्यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाले, असे आता म्हटले जात आहे.