शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जावडेकर ठरले डार्क हॉर्स

By admin | Updated: May 27, 2014 05:19 IST

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला.

यदु जोशी, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. सगळ्या घटनाक्रमात जावडेकर डार्क हॉर्स ठरणे राज्यातील नेत्यांसाठीही अनपेक्षित होते. सकाळपर्यंत महाराष्ट्रातील भाजपाच्या सात जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे मानले जात होते. चर्चेतील नावांपैकी हंसराज अहिर, दिलीप गांधी आणि हरिश्चंद्र चव्हाण यांचा अंतिमत: समावेश झाला नाही आणि जावडेकर सर्वांना धक्का देत पुढे निघून गेले. राज्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळातील नावे मोदींनी ठरविलेली होती. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेली रावसाहेब दानवे, पीयूष गोयल यांच्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. गडकरी, मुंडेंचे नाव अर्थातच होते. मात्र, राज्यातील नेत्यांनी सुचविलेली गांधी, चव्हाण, अहिर ही नावे स्वीकारली नाहीत. उलटपक्षी जावडेकर यांचा समावेश करीत अंतिम शब्द आपलाच असेल, असा सूचक इशारा दिला. जावडेकर यांचा समावेश करीत असल्याचे त्यांनी सकाळी अन्य नेत्यांना सांगितले. जावडेकर यांची निवड आमच्यासाठी अनपेक्षित होते, असे एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. रा.स्व. संघानेही त्यांच्या समावेशासाठी आग्रह धरला, असे समजते. मेहनतीचे बक्षीस पक्षाने काही दिले अन् न दिले तरी पक्ष कार्याप्रतीची निष्ठा कमी होऊ द्यायची नाही या विचाराने कार्यरत राहिल्याने जावडेकर यांना आज मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले, असे म्हटले जाते. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर जावडेकर निराश झाले नाहीत. नंतर त्यांना ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी दिल्लीला नेले. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. पुढे ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला तेव्हा पक्षाने त्यांच्याऐवजी आपल्या कोट्यातून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठविले. आठवलेंसाठी जावडेकरांचा बळी घेतला गेला, अशी टीकाही झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी त्यांची सुरुवातीला इच्छा होती पण पक्षनेतृत्वाचा कल लक्षात घेऊन ते पुन्हा दिल्लीत सक्रिय झाले. राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी समर्थपणे पेलत राहिले. सोबतच देशपातळीवर निवडणुकीच्या नियोजनात पक्षासाठी त्यांनी योगदान दिले. सीमांध्र आणि तेलंगणामध्ये तेलगू देसम पक्षाशी भाजपाची युती होण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. ही युती तुटणार की काय, असा पेच निर्माण झाला होता; पण जावडेकर यांनी खुबीने तो टाळला. भाजपामध्ये ते नेहमीच लो प्रोफाईल राहिले. या सगळ्या बाबींचे बक्षीस त्यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाले, असे आता म्हटले जात आहे.