शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

जन्मोत्सव आत्मचिंतनाचा दिवस : श्रीकाशी जगद्गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:32 IST

‘अष्टावरण विज्ञान’ पुस्तकाचे प्रकाशन

वाराणसी : जन्मदिन हा केवळ आनंदोत्सव नाही. यानिमित्ताने जीवनाचा आढावा घेऊन आत्मचिंतन केले पाहिजे. जन्माला आल्यापासून आजपर्यंत काय केले व पुढे काय करायचे, हा विचार करण्यासाठी वाढदिवसाचे आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

वाराणसी येथील जंगमवाडी मठात ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ७८ वा जन्मोत्सवानिमित्त ‘अष्टावरण विज्ञान’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, प्रा. भीमाशंकर मोतीपवळे, प्रा. डॉ. कमलेश झा, सुभाष म्हमाणे उपस्थित होते.

डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी लिखित ‘अष्टावरण विज्ञान’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन बीएचयूचे प्रा. डॉ. कमलेश झा आणि बसवराज पाटील यांच्या हस्ते झाले. सोलापूरचे कवी लिं. कुमार कोठावळे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. हैदराबादचे वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री आणि मठातील वेदमूर्ती मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वैदिक यज्ञाचे पौरोहित्य केले. पीठाचे व्यवस्थापक आर. के. स्वामी यांनी प्रास्ताविक, तर प्रा. रेवणसिद्ध शाबादे यांनी सूत्रसंचालन केले. नलिनी चिरमे, शिवानंद हिरेमठ, भक्त आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश