शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

बिहारमध्ये जन्माष्टमी, रामनवमीच्या सुट्ट्या रद्द, तर मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:46 IST

Bihar News: बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात  भाजपाने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, नितीश कुमार यांनी बिहारला इस्लामिक स्टेट घोषित करण्याची घोषणाही या निर्णयांसोबतच करून टाकावी, असा टोला भाजपाने लगावला आहे. 

हे संपूर्ण प्रकरण बिहार सरकारच्या सुट्ट्यांशी संबंझित आहे. बिहार सरकारने शुक्रवारी साप्ताहित सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच बिहारमध्ये जे प्रदेश मुस्लिम बहूल आहेत, म्हणजेच मुस्लिम बहुसंख्य असतील तिथे आता शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असेल. मुस्लिमांसाठी शुक्रवारी सुट्टी जाहीर करणारं बिहार हे देशातील पहिलं राज्य आहे. 

या निर्णयामध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले की, हा आदेश केवळ उर्दू शाळांसाठी नाही तर मुस्लिम बहूल भागातील कुठल्याही सरकारी शाळांनाही लागू राहिली. तिथे आता रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी दिली जाईल. याबाबत शिक्षण विभागाकडून अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी त्या जिल्ह्याच्या डीएमची परवानगी आवश्यक असेल. त्यांनी तशी परवानगी दिली की, शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाईल.

एवढंच नाही तर शिक्षण विभागाने २०२४ साठी सरकारी शाळांच्या सुट्टीची यादीही प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाने २०२४ मध्ये ईद आणि बकरी ईदच्या सुट्टीमध्ये वाढ केली आहे. आता ईद आणि बकरी ईदला दोन ऐवजी तीन दिवस सुट्टी असेल. त्याशिवाय मोहरमला दोन दिवस, शब-ए-बारात या दिवशीही एक एक दिवसाची सुट्टी असेल. मात्र या सुट्ट्या देताना बिहार सरकारने जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री, रक्षाबंधन, तीन, जीतिया, यांसारख्या उत्सवांदिवशी दिली जाणारी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. 

या निर्णयाविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर म्हणाले की, आम्ही आधीपासूनच सांगतोय की, नितीश सरकार बिहारमध्ये गझवा ए हिंद कायदा आणू इच्छित आहे. आता या निर्णयामुळे आमचा आरोप आणि संशय खरा होता, हे सिद्ध झाले आहे.  आता नितीश कुमार यांनी बिहारला इस्लामिक स्टेटसुद्धा घोषित केलं पाहिजे. 

दरम्यान, या प्रकरणी बिहार सरकारचे वरिष्ठ मंत्री अशोच चौधरी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा निर्णय प्रधान सचिव आणि मंत्र्यांनी पाहिला नसेल. हा जनभावनांशी संबंधित विषय आहे. बऱ्याच वर्षांपासून सुट्ट्या देण्यात येत आहेत. आता सुट्ट्या रद्द केल्या तर जनभावना दुखावल्या जाऊ शकतात. सुट्ट्या रद्द करण्याचं कुठलंही औचित्य नाही आहे. कुणाच्या भावना दुखावणे योग्य नाही. या विषयी चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांना जसे याबाबत समजेत, तसे ते या प्रकरणात हस्तक्षेप करतील. हा निर्णय खाली बाबू स्तरावर घेतला गेला असावा, असं वाटतं, अशी सारवासारव त्यांनी केली.  

टॅग्स :BiharबिहारEducationशिक्षणNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण