शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, शाह, राजनाथ...1 तास चालली CCS ची बैठक, दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:59 IST

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक झाली.

Jammu-Kashmir Terror Attack : राजधानी दिल्लीत आज कॅबिनेट सुरक्षा व्यवहार समिती, म्हणजेच CCS ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एक तास चाललेल्या या बैठकीत जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ले आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवादी सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या विविध भागात दहशतवादी हल्ले वाढले असून, यामध्ये अनेक जवानही शहीद झाले आहेत. आता सरकार या दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीर खोऱ्यातील हल्ल्यांपैकी डोडाचे प्रकरण ताजे आहे. येथे सोमवारी(दि. 26) सायंकाळी झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले होते.

आजही सकाळी(दि.18) जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील कास्तीगड भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, डोडामधील कास्तीगड भागात अजूनही चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवानही जखमी झाला आहे. दरम्यान, डोडा येथे महिनाभरात दहशतवाद्यांशी चकमक होण्याची ही सहावी घटना आहे.

डोडा चकमकीत पाच जवान शहीदसोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह 5 जवानांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डोडा शहरापासून 55 किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहिम सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला, सैन्याच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर सैनिकांनीही घनदाट जंगलातून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास जंगलात आणखी एक चकमक झाली. या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले, ज्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. शहीद झालेल्या जवानांमध्ये लष्कराचा एक अधिकारी, तीन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश आहे.

काश्मीर टायगर्सने घेतली जबाबदारी काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने डोडा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मदची शाखा आहे. याच संघटनेनं कठुआ येथील लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंह