शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 09:45 IST

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader) गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) हे शनिवारी जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील उधमपूर येथे नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकांना फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, असा सल्ला दिला. "सरपंच, जिल्हा, ब्लॉक विकास परिषदा, संसद सदस्य किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांमद्ये कधीपर्यंत फूट पाडत राहणार," असंही ते म्हणाले. 

"तुम्ही चांगलं काम, मानव सेवा आणि राजकारणाच्या जोरावर जे काही पाहिजे मिळवू शकतो. लोकांमध्ये फूट पाडून, द्वेष पसरवून आपल्या देशाचं, धर्माचं आणि समाजाचंच नुकसान होणार आहे," असं गुलाम नबी आझाद म्हणाले. यावेळी त्यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "लोक स्वेच्छेने धर्मांतर करत आहेत. कोणीही तलवारीच्या धाकाने करत नाही," असंही ते म्हणाले. ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शांतता, बंधुत्व आणि करोनाच्या महासाथीचा खात्म्यासाठी प्रार्थना करण्यास आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचेही ते म्हणाले. 

"मी कायमच दरबार मूवचं समर्थन करत होतो. महाराजांनी आपल्याला तीन गोष्टी दिल्या आणि त्या जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताच्या होत्या. त्यापैकी एक दरबार मूव होती. महाराजा (हरी सिंह) यांनी जे या प्रदेशातील नसलेल्या लोकांपासून भूमी आणि नोकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली होती," असंही ते म्हणाले.

महाराजांचं शासन चांगलं होतंयावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरही भाष्य केलं. "आज इतक्या वर्षांनी आपण पाहतोय की महाराजा ज्यांना हुकुमशाह असं म्हटलं जायचं ते वर्तमान सरकारच्या तुलनेत चांगले होते. महाराजा जनतेच्या कल्याणासाठी काम करत होते. परंतु वर्तमान सरकारनं आमच्याकडून तिन्ही गोष्टी हिरावून घेतल्या," असंही आझाद म्हणाले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीर