शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंटने घेतली कुलगाम हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 11:43 IST

केंद्रीय एजन्सी आणि सरकारला इशारा देताना दहशतवादी संघटनेने म्हटले की, काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम वाईट होतील.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये इतर राज्यातील प्रवासी मजुरांवरील हल्ले वाढले आहेत. या महिन्यात अकरा बिगर काश्मीरी नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने प्रवासी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच आता काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनांनी बिगर काश्मीरी नागरिकांविरोधात धमकी देणारं पत्र जारी केलं आहे. तसेच, या संघटनांनी कुलगाम हत्याकांडाची जबाबदारीही स्वीकारली आहे. 

रविवारी कुलगाम जिल्ह्यातील वानपोहमध्ये दहशतवाद्यांनी एका घरात घुसून बिहारमधील मजुरांची हत्या केली. त्यापूर्वी शनिवारीही बिहार आणि यूपीच्या दोन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये बिगर काश्मीरी नागरिकांवर वाढलेल्या हल्ल्यामुळे अनेकांनी राज्य सोडले आहे, तर बरेचजण राज्य सोडण्याच्या तयारीत आहेत. राजस्थानमधील एक स्थलांतरित व्यक्ती म्हणतो, इथली परिस्थिती बिकट होत आहे. आम्ही घाबरलो आहोत, आमच्याबरोबर मुले आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या गावी परत जात आहोत. 

कुलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत काश्मीर फ्रीडम फायटर्सने म्हटले की, बिगर स्थानिक लोक भारतीय एजन्सींच्या संपर्कात होते. केंद्रीय एजन्सींना इशारा देताना संघटनेनं म्हटले की, जर काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम धोकादायक होतील. जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंटकडूनही इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला