शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंटने घेतली कुलगाम हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 11:43 IST

केंद्रीय एजन्सी आणि सरकारला इशारा देताना दहशतवादी संघटनेने म्हटले की, काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम वाईट होतील.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये इतर राज्यातील प्रवासी मजुरांवरील हल्ले वाढले आहेत. या महिन्यात अकरा बिगर काश्मीरी नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने प्रवासी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच आता काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनांनी बिगर काश्मीरी नागरिकांविरोधात धमकी देणारं पत्र जारी केलं आहे. तसेच, या संघटनांनी कुलगाम हत्याकांडाची जबाबदारीही स्वीकारली आहे. 

रविवारी कुलगाम जिल्ह्यातील वानपोहमध्ये दहशतवाद्यांनी एका घरात घुसून बिहारमधील मजुरांची हत्या केली. त्यापूर्वी शनिवारीही बिहार आणि यूपीच्या दोन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये बिगर काश्मीरी नागरिकांवर वाढलेल्या हल्ल्यामुळे अनेकांनी राज्य सोडले आहे, तर बरेचजण राज्य सोडण्याच्या तयारीत आहेत. राजस्थानमधील एक स्थलांतरित व्यक्ती म्हणतो, इथली परिस्थिती बिकट होत आहे. आम्ही घाबरलो आहोत, आमच्याबरोबर मुले आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या गावी परत जात आहोत. 

कुलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत काश्मीर फ्रीडम फायटर्सने म्हटले की, बिगर स्थानिक लोक भारतीय एजन्सींच्या संपर्कात होते. केंद्रीय एजन्सींना इशारा देताना संघटनेनं म्हटले की, जर काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम धोकादायक होतील. जम्मू-काश्मीरमधील सक्रिय दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंटकडूनही इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला