शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:57 IST

मक्तेदारी, भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या मुळाशी हेच कलमच अमित शहा यांचा घणाघात

नवी दिल्ली : गेली ७० वर्षे कलम ३७०ला कवटाळून बसल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे वाटोळेच केले. पृथ्वीवरील हा स्वर्ग दहशतवादाच्या छायेखाली तीन कुटुंबांची मक्तेदारी बनून राहिला. भ्रष्टाचार, दहशतवादाच्या मुळाशी असलेले हे कलम रद्द केल्यानंतर, आता जम्मू-काश्मीर हे येत्या पाच वर्षांत देशातील सर्वात विकसित राज्य बनेल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत या विषयावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.कलम ३७० आणि ३५ अ हटविणे हाच काश्मीरच्या विकासाचा आणि तेथील समस्या सोडविण्याचा एकमेव उपाय असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले की, या कलमांनी राज्य मागासलेले ठेवले. येथे उद्योग, पर्यटनाचा विकास होऊ शकला नाही. कलम ३७० मुळेच रक्तपात होऊन ४१ हजार ४०० जणांचे बळी गेले. आमचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांना प्राण गमवावे लागले. केंद्र सरकारने राज्यांच्या हितासाठी केलेले कायदे तेथे ३७० मुळेच लागू होऊ न शकल्याने राज्याचे नुकसानच झाले. आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत.जम्मू-काश्मीरमधील उद्योग, व्यवसायही तीन कुटुंबांच्याच हाती आजही आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे होऊ दिल्या नाहीत. लोकशाही खाली झिरपू दिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य ठिकाणी ओबीसी, दलित, आदिवासींना आरक्षण मिळू दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका करविल्या. जे नेते काश्मीरच्या चिंतेची आवई उठवित आहेत, त्यांची मुले लंडन, अमेरिकेत शिकतात. आता कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरची संस्कृती नष्ट होईल, अशी ओरड करणाऱ्यांनी अन्य राज्यांत हे कलम नसताना तेथील संस्कृती नष्ट झाली आहे का, असा सवाल अमित शहा यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यानेच आज कलम ३७० आणि ३५अ रद्द केले जात आहे. काँग्रेसने ती कधीही दाखविली नाही. कलम ३७०च्या आड पाकिस्तानने नेहमीच फुटीरतावाद्यांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न केले. धर्म, राजकारणाच्या पलीकडे आम्ही काश्मीर समस्येकडे पाहतो. कलम ३७० हटावे ही देशातील लाखो-करोडो लोकांची भावना आहे आणि आजच्या निर्णयाने त्याचा आदरच झाला आहे, असे अमित शहा म्हणाले.निर्बंध लवकरच हटवूजम्मू-काश्मीरमध्ये काही निर्बंध सध्या आणण्यात आले आहेत आणि ते सद्यस्थितीत योग्यही आहेत, असे सांगून अमित शहा यांनी योग्य वेळी ते निर्बंध हटविले जातील, अशी ग्वाही सभागृहाला दिली.नेहरूंना केले लक्ष्यभारतातील सहाशे संस्थाने भारतात विलीन झाली. त्याचे मोठे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते. ही संस्थाने असलेल्या ठिकाणी कलम ३७० न आणता त्यांना भारतात आणले गेले. फक्त काश्मीरचा विषय हा पंडित जवाहरलाल नेहरू हाताळत होते आणि तिथे हे कलम आणले गेले, या शब्दात अमित शहा यांनी नेहरूंना टीकेचे लक्ष्य केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Amit Shahअमित शहाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू