शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:45 IST

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवल्यानंतर वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे.

Jammu Kashmir Election 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपचे माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे ही जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी मतदारसंघात यायचा. या जागेवर भाजप आणि काँग्रेसनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे. अयोध्या आणि बद्रीनाथसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी भाजपने जास्त जोर लावला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्या आणि नाशिकसारख्या धार्मिक शहरांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि हरिद्वारच्या येथील पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला. एवढंच नाही तर प्रयागराज आणि चित्रकूटसारख्या लोकसभेच्या जागा भाजपने गमावल्या होत्या. यातील अयोध्येचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच भाजप कोणत्याही परिस्थितीत श्री माता वैष्णोदेवीची जागा गमवायची नाही.

2008 आणि 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे माता वैष्णोदेवी विधानसभा जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी सीटच्या अंतर्गत येत होता. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून भाजपने आपली पकड निर्माण केली होती. त्यानंतर 2014 मध्येही भाजपला यश मिळाले होते. गेल्या 16 वर्षांपासून भाजपचे येथे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने बलदेवराज शर्मा यांना जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेसने भूपेंद्र जामवाल यांना रिंगणात उतरवून लढत रंजक बनवली आहे.

भाजपसाठी सर्वात मोठा ताणभाजपसाठी सर्वात मोठे टेन्शन वैष्णोदेवीतील शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीचे आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूरमध्ये आयोजित सभेत बारीदारांना हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शहरातील विकासकामांसाठी पाडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात घरे आणि जमिनींचा योग्य मोबदला न मिळणे. त्यामुळे अयोध्येतील जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे मानले जात आहे. श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती दिसून येत आहे. शेतकरी संतप्त असून अनेक दिवसांपासून आपल्या हक्काची मागणी करत आहेत.

माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघात एकूण 74 हजार मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 15 हजार शेतकरी आहेत. बरिदार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्याम सिंह माता वैष्णोदेवी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंजक बनली आहे. मतांमध्ये फूट पडली तर भाजपला ही जागा जिंकणे सोपे जाणार नाही. इथे नेमका काय निकाल लागणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी