शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:45 IST

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवल्यानंतर वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे.

Jammu Kashmir Election 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपचे माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे ही जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी मतदारसंघात यायचा. या जागेवर भाजप आणि काँग्रेसनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे. अयोध्या आणि बद्रीनाथसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी भाजपने जास्त जोर लावला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्या आणि नाशिकसारख्या धार्मिक शहरांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि हरिद्वारच्या येथील पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला. एवढंच नाही तर प्रयागराज आणि चित्रकूटसारख्या लोकसभेच्या जागा भाजपने गमावल्या होत्या. यातील अयोध्येचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच भाजप कोणत्याही परिस्थितीत श्री माता वैष्णोदेवीची जागा गमवायची नाही.

2008 आणि 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे माता वैष्णोदेवी विधानसभा जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी सीटच्या अंतर्गत येत होता. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून भाजपने आपली पकड निर्माण केली होती. त्यानंतर 2014 मध्येही भाजपला यश मिळाले होते. गेल्या 16 वर्षांपासून भाजपचे येथे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने बलदेवराज शर्मा यांना जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेसने भूपेंद्र जामवाल यांना रिंगणात उतरवून लढत रंजक बनवली आहे.

भाजपसाठी सर्वात मोठा ताणभाजपसाठी सर्वात मोठे टेन्शन वैष्णोदेवीतील शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीचे आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूरमध्ये आयोजित सभेत बारीदारांना हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शहरातील विकासकामांसाठी पाडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात घरे आणि जमिनींचा योग्य मोबदला न मिळणे. त्यामुळे अयोध्येतील जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे मानले जात आहे. श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती दिसून येत आहे. शेतकरी संतप्त असून अनेक दिवसांपासून आपल्या हक्काची मागणी करत आहेत.

माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघात एकूण 74 हजार मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 15 हजार शेतकरी आहेत. बरिदार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्याम सिंह माता वैष्णोदेवी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंजक बनली आहे. मतांमध्ये फूट पडली तर भाजपला ही जागा जिंकणे सोपे जाणार नाही. इथे नेमका काय निकाल लागणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी