शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:16 IST

Pahalgam Terror Attack: आम्ही स्थानिकांना विश्वास देऊ इच्छितो की, या कठीण परिस्थितीत आम्ही स्थानिकांच्या सोबत आहोत, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. तसेच भारताने सिंधू नदीच्या पाणीवाटपावरून धोरणात्मक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यातच आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पलटवार केला आहे. 

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले. परंतु, पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेणे टाळले. पहलगाम हल्ल्याशी आमचा कोणताच संबंध नसल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले. मात्र, यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया देताना, पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी यावरून पाकिस्तावर टीका केली आहे. 

पहलगाम येथे झाले, ते व्हायला नको होते

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याचे पाकिस्तान मान्यच करायला तयार नव्हते. हा हल्ला हिंदुस्थानने केला, हीच त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. ज्या लोकांनी भारतावरच आरोप केले, त्यांच्याबाबत आता काय बोलणार? त्यांच्या विधानाबाबत मी काही जास्त बोलू इच्छित नाही. पहलगाम येथे झाले, ते व्हायला नको होते. त्या घटनेचे दुःखच आहे, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच सिंधू जल करारामुळे आधीच जम्मू काश्मीरचे खूप नुकसान झाले आहे. आता यावर काही निर्णय होत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे, असेही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

काही असले तरी प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो

पर्यटकांच्या मनात प्रचंड भीतीची जी भावना तयार झाली आहे, ती नक्कीच समजू शकतो. सुट्टीचा आनंद अनुभवण्यासाठी जे इथे येतात, त्यांना असे तणावात टाकणे योग्य नाही. परंतु, पर्यटकांना एवढेच सांगू इच्छितो की, अशा परिस्थितीत काश्मीरला त्यांनी एकटे सोडले, तर भारताचे जे शत्रू आहे, त्यांचा हेतू साध्य होऊ शकतो. कारण, ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, त्यांचा हेतू हाच होता की, काश्मीरमधून सर्व पर्यटकांनी निघून जायला हवे. काही असले तरी प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. त्यामुळे पर्यटकांना आवाहन करतो की, परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला पहलगाम येथे दाखल झाले. हेलिकॉप्टर येथे उतरू शकत नव्हते. त्यामुळे तत्काळ येता आले नाही. आता पहलगाम येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे. तेथील स्थानिकांनी स्थलांतर होण्याबाबत विनंती केली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्यासाठी दुसरी योग्य जागा पाहून घरे बांधण्यास मदत करण्याबाबतच्या सूचना केली आहे. त्यांच्या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, हा विश्वास स्थानिकांना देतो, असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाPakistanपाकिस्तान