शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:39 IST

Jammu-Kashmir:सीआरपीएफने नक्सलग्रस्त राज्यात विविध कारवायांमध्ये 19 माओवाद्यांचा खात्मा केला तर 699 जणांना अटक केली.

नवी दिल्ली: 1 मार्च 2021 ते 16 मार्च 2022 दरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) जम्मू आणि काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 183 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याच काळात सीआरपीएफने अतिरेकी नक्सलग्रस्त राज्यांमध्ये झालेल्या विविध कारवायांमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आणि 699 जणांना अटक केली.

सीआरपीएफ शनिवारी जम्मूमधील एमए स्टेडियमवर आपल्या 83व्या स्थापना दिनानिमित्त परेड आयोजित करेल. दिल्ली-NCR बाहेर CRPF आपला स्थापना दिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग म्हणाले की, सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण चांगले आहे. येत्या काळात यात आणखी सुधारणा होईल. ते म्हणाले, “केंद्र सरकारने सशस्त्र दलांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त देशात विविध ठिकाणी परेड आयोजित करून लोकांसमोर ताकद दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. हे जवानांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी, विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. हे राष्ट्रीय एकात्मतेला देखील मदत करेल."

एएनआयने कुलदीप सिंगच्या हवाल्याने म्हटले की, “सीआरपीएफ देशातील विविध श्रेणीतील 117 लोकांना सुरक्षा कवच देत आहे. व्हीआयपी सुरक्षा शाखेत बत्तीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 5 राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण 41 व्हीआयपींना सीआरपीएफने सुरक्षा पुरवली होती. यापैकी 27 जणांची सुरक्षा निवडणुकीनंतर काढून घेण्यात आली आहे.

दगडफेकीच्या घटना घटल्याकाही दिवसांपूर्वी झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या हत्येबाबत विचारले असता ते म्हणाले की, या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत कमीत कमी वेळात गुन्हेगाराला अटक केली. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर बोलताना CRPF DG कुलदीप सिंह म्हणाले, कलम 370 रद्द केल्यापासून दगडफेकीच्या घटना जवळपास शून्य झाल्या आहेत. विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ले यातही घट झाली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीDeathमृत्यू