शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:07 IST

Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं.

ठळक मुद्देदहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली.

नवी दिल्ली: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. तेव्हापासून काश्मीरमधील विरोधी नेते राज्याला विशेष राज्याचा दर्जा परत करण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. 

परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा दिला जाईल, असं मोठं विधान गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केलं आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, 24 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती, त्यातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हाही पंतप्रधानांनी हेच विधान केलं होतं. मला विश्वास आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल. 

दहशतवादी कारवाया कमी झाल्याखासदार सस्मित पात्रा यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर प्रश्न विचारला. त्यावर नित्यानं राय म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली. तर, 2020 च्या तुलनेत जून 2021 पर्यंत या घटना 31% कमी झाल्या. नित्यानंद पुढे म्हणाले की, सरकारची दहशतवाद्यांविरोधात झिरो टॉलरेंसची रणनिती आहे. मागील काही वर्षात सरकारने राज्यातील सुरक्षा मजबुत करण्यासाठी अनेक ठोस पाउलं उचलली आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370ladakhलडाख