शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:07 IST

Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं.

ठळक मुद्देदहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली.

नवी दिल्ली: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. तेव्हापासून काश्मीरमधील विरोधी नेते राज्याला विशेष राज्याचा दर्जा परत करण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. 

परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा दिला जाईल, असं मोठं विधान गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केलं आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, 24 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती, त्यातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हाही पंतप्रधानांनी हेच विधान केलं होतं. मला विश्वास आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल. 

दहशतवादी कारवाया कमी झाल्याखासदार सस्मित पात्रा यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर प्रश्न विचारला. त्यावर नित्यानं राय म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली. तर, 2020 च्या तुलनेत जून 2021 पर्यंत या घटना 31% कमी झाल्या. नित्यानंद पुढे म्हणाले की, सरकारची दहशतवाद्यांविरोधात झिरो टॉलरेंसची रणनिती आहे. मागील काही वर्षात सरकारने राज्यातील सुरक्षा मजबुत करण्यासाठी अनेक ठोस पाउलं उचलली आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370ladakhलडाख