शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 09:05 IST

लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं

श्रीनगर: यंदाच्या वर्षात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. भारतीय जवानांनी काल काश्मीर खोऱ्यातील केरन सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे यंदाच्या वर्षात भारतीय लष्कराच्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 200 वर गेला आहे. वर्ष संपायला अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कारवाई सुरुच असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.यंदाच्या वर्षात काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई केली. लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईचा मोठा दणका जैश-ए-मोहम्मदला बसला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 50 टक्के दहशतवादी मारले गेले. तर हिज्बुलच्या 40 टक्क्यांहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कर-ए-तोयबालादेखील भारतीय जवानांनी दणका दिला. त्यांचे 33 टक्के दहशतवादी यंदाच्या वर्षात मारले गेले. यंदाच्या वर्षात भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात दुहेरी कारवाई केली. सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबतच स्थानिक दहशतवाद्यांचंही आव्हान लष्करासमोर होतं. हे दुहेरी आव्हान लष्करानं यशस्वीपणे पेललं. 2017 मध्ये काश्मीरमध्ये लष्करानं ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलं होतं. त्याच प्रकारची कारवाई लष्करानं यंदाच्या वर्षातही केली. रमजानच्या पवित्र महिन्यात मोदी सरकारनं काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली होती. त्या काळात दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं होतं. त्यामुळे सरकारवर टीकाही झाली. मात्र रमजान संपताच लष्करानं दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादJaish e Mohammadजैश ए मोहम्मदLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन