शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:45 IST

Jammu And Kashmir : जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - गेल्या दीड महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जैशच्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधी दरम्यान फक्त 8 दहशतवादी मारले गेले होते.

गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि नागरिकांना लक्ष्य करून कारवाया तीव्र झाल्या आणि परिणामी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच सुरक्षा दलाचे पाच जवानही शहीद झाले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत एकही सामान्य नागरिक मारला गेला नसल्याचं अधिकृत आकडेवारीवरून दिसून येत आहे.

2021 मध्ये 193 दहशतवादी ठार झाले. तर 2020 मध्ये 232 दहशतवादी खात्मा झाला. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुासर, आता सुरक्षा दलांमध्ये पूर्वीपेक्षा चांगला समन्वय आहे. 29 जानेवारी रोजी बडगाम आणि पुलवामा येथे झालेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.

पोलिसांनी दहशतवाद्यांची ओळख जैश कमांडर जाहिद वानी, पाकिस्तानी दहशतवादी वाहिद अहमद रिशी आणि दोन स्थानिक रहिवासी कफील उर्फ ​​छोटा पाकिस्तानी आणि इनायतुल मीर अशी केली. शुक्रवारी गृहमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेतली. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे 91 जवान शहीद झाले, तर 2021 मध्ये 42 जवान शहीद झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी