शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 21:15 IST

'पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. '

Rajnath Singh : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 9व्या सशस्त्र सेना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीर पीओकेशिवाय अपूर्ण आहे. पीओके पाकिस्तानचा नाही, तर भारताचा भूभाग आहे. पीओकेच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातोय. पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, असा दावा त्यांनी केला. 

पीओकेमध्ये दहशतवादी केंद्रेजम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे माजी सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. सीमेजवळील भागात लाँच पॅड बनवण्यात आले आहेत. भारत सरकारला याची संपूर्ण माहिती आहे. पाकिस्तानने पीओकेत दहशतवादी कारवाया थांबवाव्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भारत नेहमीच पाकिस्तानला वरचडसंरक्षण मंत्री पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 मध्ये अखनूर येथे युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले. इतिहासातील सर्व युद्धांमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान 1965 पासून अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आपल्या मुस्लिम बांधवांनी दहशतवादाविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजही भारतात घुसणारे 80% पेक्षा जास्त दहशतवादी हे पाकिस्तानचे आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद 1965 मध्येच संपुष्टात आला असता, परंतु तत्कालीन केंद्र सरकार योग्य पाऊले उचलू शकली नाही.

जम्मू-काश्मीरच्या मुस्लिमांचा पाकिस्तानला पाठिंबा नाहीराजनाथ सिंह म्हणाले, 1965 च्या युद्धादरम्यान किंवा दहशतवादाच्या शिखरावर असताना जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानला साथ दिली नाही. अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवादाशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोहम्मद उस्मान यांच्यासारख्या व्यक्तींच्या बलिदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

ओमर अब्दुल्लांचे कौतुक राजनाथ सिंह यांनी ओमर अब्दुल्लांचे कौतुक केले. ते म्हणाले की, काश्मीर आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेली दरी कमी करणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून या दिशेने पावले उचलली जात आहेत. अखनूरमधील वेटरन्स डे सेलिब्रेशनने हे सिद्ध केले की, अखनूरचे आपल्या हृदयात दिल्लीसारखेच स्थान आहे.

सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देतेसंरक्षण मंत्री म्हणाले की, भाजप सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देते. पूर्वीच्या सरकारांनी काश्मीरला वेगळी वागणूक दिली होती. याचा परिणाम असा झाला की या भागातील आपले बंधू-भगिनी दिल्लीशी ज्या प्रकारे जोडले जायला हवे होते, तसे होऊ शकले नाहीत. मला भूतकाळात जायचे नाही कारण आमच्या सरकारचे सर्वात मोठे यश हे आहे की, आम्ही काश्मीर आणि देशाच्या इतर सर्व भागांमधील अंतःकरणातील दरी कमी करण्याचे काम करत आहोत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके