शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Jammu and Kashmir : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतेय, आझाद यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:36 IST

कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नवी दिल्ली - कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेतली. या प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

कलम 370 हटवल्याच्या विवादानंतर गुलाम नबी आझाद आज श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात ते कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचं चित्र समोर आलं आहे. काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य आहे. तर काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

पत्रकारांनी गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहेत, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता. काश्मिरी लोकांवर कर्फ्यू लावण्यात आला आहे हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. त्यावर भाजपाचे नेते शाहनवाज हुसैन यांनी पलटवार करत काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुलाब नबी यांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नबी यांनी केलेल्या विधानाबाबत तात्काळ माफी मागावी, असेही भाजपानं सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील स्थिती सध्या तणावग्रस्त आहे. फुटिरतावादी नेत्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या कारणास्तव खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी जवान तैनात आहेत. गुरुवारी सकाळी येथील बाजारपेठा उघडण्यात आल्या. जम्मूतील लोकं दैनदिन व्यवहार करण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरुन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसBJPभाजपा