शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"...तर त्यांनी निवडणूक लढू नये!" उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:09 IST

"निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे दुटप्पीपणाचे..."

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी ईव्हीएमवरील (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, निवडणुकीत जिंकल्यानंतर, ईव्हीएम स्वीकारणे आणि हरल्यानंतर, त्याला दोषी ठरवणे, हे दुटप्पीपणाचे आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ते पीटीआयच्या मुलाखतीत बोलत होते.

उमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘जेव्हा याच ईव्हीएमच्या माध्यमाने संसदेत आपले शंभरहून अधिक खासदार पोहोचतात आणि आपण याला पक्षाचा विजय म्हणून साजरे करता, तेव्हा काही महिण्यांनंतर, हे इव्हीएम आपल्याला पसंत नाही, कारण निवडणुकीचे निकाल आता आम्हाला हवे तसे येत नाहीयेत, असे म्हणू शकत नाही. यावर, आपण भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे बोलत आहात, असे म्हटले असता, अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देव न करो, हे असेच आहे. जे खरे आहे, ते खरे आहे. आपण आघाडीतील सहकाऱ्यांप्रति निष्ठे ऐवजी सिद्धांतांवर बोलतो."

त्यांनी निवडणूक लढू नये -यावेळी, सर्वसाधारणपणे विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस ईव्हीएमवर लक्ष केंद्रित करून चुकीचा मार्गावर जात आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराजयानंतर, काँग्रेसने ईव्हीएम आणि निवडणूक निकालांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी निवडणुकीत बॅलेट पेपरवर परतण्याची मागणी केली आहे, असे विचारले असता उमर अब्दुल्ला म्हणाले, "जर पक्षांना मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये. जर आपल्याला ईव्हीएमची समस्या असेल, तर त्यासंदर्भात आपली भूमिका एकसारखीच असायला हवी."

यावेळी उमर अब्दुल्ला यांनी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचे कौतुकही केले. "मला वाटते की दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात जे काही होत आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. माझ्या मते, नवीन संसद भवन बांधणे ही एक चांगली कल्पना होती. आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीची गरज होती, जुन्या इमारतीची उपयुक्तता संपली आहे’’  

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीन