शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"मग इंडिया आघाडी बंद करुन टाका"; दिल्लीतल्या आप आणि काँग्रेसच्या वादावर ओमर अब्दुलांचे स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:25 IST

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया विरोधी आघाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत

Omar Abdullah on INDI alliance: गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाही हे दुर्दैव आहे. असं असेल तर इंडिया आघाडी बंद करुन टाका असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या गोंधळावरही  ओमर अब्दुल्ला यांनी भाष्य केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही आघाडी केवळ संसदेच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहिली असेल, तर ती विसर्जित केली पाहिजे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

"दिल्लीत काय चालले आहे यावर मी काहीही बोलू शकत नाही कारण आमचा दिल्लीच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि तिथे असलेल्या इतर पक्षांनी भाजपचा मुकाबला कसा करता येईल हे ठरवावे. याआधी तिथे आम आदमी पार्टीला सलग दोनदा यश मिळाले होते. त्यामुळे जनतेला निर्णय घ्यावा लागेल," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.

"मला आठवत आहे त्यानुसार, इंडिया आघाडीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नव्हती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाहीये. त्यामुळे आघाडीचे नेतृत्व, अजेंडा आणि अस्तित्व याबाबत स्पष्टता नाही. कदाचित दिल्लीच्या निवडणुका संपल्यानंतर इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना बोलवले जाईल. जर ही आघाडी लोकसभेच्या निवडणुकीपुरती मर्यादित असेल तर त्यांनी ती संपवायला हवी. विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे," असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, दिल्ली निवडणुकीबाबत आप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना ओमर अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भाजपविरुद्ध विरोधकांना एकत्र करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळात विविध पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असून त्यामुळे इंडिया आघाडीचे भविष्य धोक्यात आलं आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकOmar Abdullahउमर अब्दुल्लाcongressकाँग्रेस