शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाला चालना शक्य -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 05:19 IST

आमच्या सरकारने जम्मू-काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचे भारतीय जनता समर्थन करीत आहे.

नवी दिल्ली : आमच्या सरकारने जम्मू-काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचे भारतीय जनता समर्थन करीत आहे. हा विषय देशाचा असून, त्यात राजकारण आणणे चुकीचे आहे. आतापर्यंत तेथील लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळेच आजतागायत जम्मू-काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र, आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.देशातील अनेक लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो. कारण आजतागायत जे अशक्य वाटत होते ते शक्य होताना दिसत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, हळूहळू जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल.अनुच्छेद ३७० मधील काही कलमेदेशासाठी नुकसानकारक होती. त्यामुळे काही राजकारण्यांना आणि फुटीरतावाद्यांना मदत मिळत होती. अनुच्छेद ३७० व ४५ अ यामुळे जम्मू-काश्मीर, लडाखला देशापासून वेगळे ठेवले गेले होते. गेल्या सात दशकांत त्याचा जनतेला अजिबात फायदा झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.देशातील प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही राजकीय विचारसरणीचा असो, त्याला आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेला उज्ज्वल भविष्य हवे आहे.अनुच्छेद ३७० मुळे ते शक्य होत नव्हते. परिणामी, जम्मू-काश्मीरमधील महिला, लहान मुले तसेच अल्पसंख्याक समाजातील लोकांवर प्रचंड अन्याय झाला. आता तिथे बीपीओपासून स्टार्टअपपर्यंत, खाद्यसंस्कृतीपासून पर्यटनापर्यंत अनेक उद्योग उभारले जातील. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि काश्मिरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी चालून येतील, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीत केला.कोणी केला विरोध?मोदी यांनी मुलाखतीत सांगितले की, स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांना सहानुभूती असलेले लोक आणि काही विरोधी पक्षांचे नेते यांचाच अनुच्छेद ३७० हटविण्यास विरोध होतो.विरोध करणाऱ्यांची यादी केल्यास तुम्हाला हीच मंडळी त्यात असल्याचे आढळून येईल.370अनुच्छेद हटविण्यास जे विरोध करीत आहेत, त्यांनी कधी काश्मिरी जनतेचा आवाज ऐकला आहे का? असा सवाल करून मोदी म्हणाले की, जनतेला राज्यात विकास हवा आहे, स्वत:ची आर्थिक उन्नती हवी आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक पंचायत निवडणुकांत मतदान करण्यासाठी तेथील लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्यांना मतदानापासून रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी केले; पण लोकांनी त्यांना जुमानले नाही.74% लोकांनी निवडणुकीत मतदान केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा