शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir : अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 13:09 IST

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या चार पोलिसांपैकी तीन जणांची हत्या करण्यात आली आहे.

श्रीनगर - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री चार पोलिसांचं दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले होते. यातील तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. शोपियान जिल्ह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक शुक्रवारी सकाळी  वृत्त समोर आले आहे. दरम्यान, एका पोलिसाची सुटका करण्यात आली आहे. ''राजीनामा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील'', अशी धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. 

दरम्यान, या कुकृत्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र यामागे हिजबुल मुजाहिद्दीन  दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व पोलिसांना कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.  

 

 

 

 

 

(भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी  दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती.  

यापूर्वी त्राल परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली होती. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला होता.  

तर  काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना अटक केल्याचा तसेच त्यांच्या घरांना आग लावल्याचा आरोप करून काश्मीर खोऱ्यात निषेध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्याची गेल्या 28 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPoliceपोलिस