शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 'जमियत उलेमा ए हिंद'कडून पुनर्विचार याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:14 IST

जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष सय्यद अशहद रशिदी यांनी अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली

नवी दिल्लीः जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष सय्यद अशहद रशिदी यांनी अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. 217 पानांच्या याचिकेत अयोध्येच्या जागी नमाज पठण केलं जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 1949मध्ये अवैध पद्धतीनं इमारतीत मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही पूर्ण जागाच रामलल्लाला देण्यात आली आहे, असंही याचिकेत म्हटलं आहे.   पुनर्विचार याचिका ही अयोध्या प्रकरणात पक्षकार असलेल्या एम. सिद्दिक यांचे कायदेशीर वारस असलेल्या मौलाना सय्यद अशहद रशिदी यांनी दाखल केली आहे. न्यायालयानं या प्रकरणात सर्वच पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अवैधरीत्या केलेल्या कृत्यांना माफ करण्यात आलेलं आहे. मुस्लिम पक्षकारांना मशिदीसाठी पर्यायी स्वरूपात पाच एकर जमीन देण्यात येणार आहे. त्याचा विरोध कोणत्याही मुस्लिम पक्षकारांनी केलेला नाही. तसेच या पूर्ण निर्णयालाच आम्ही आव्हान दिलेलं नाही, याचाही सर्वोच्च न्यायालयानं विचार करायला हवा, असंही  मौलाना सय्यद अशहद रशिदी यांनी याचिकेत नमूद केलं आहे.   तसेच एआयएमपीएलबीशी संबंधित जफरयाब जिलानी यांनी सांगितलं की, 9 डिसेंबरपूर्वीच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. अयोध्या प्रकरणात आम्ही सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केलेली नाही. पण समीक्षा याचिका बनवलेली असून, ती 9 डिसेंबरपूर्वी कधीही दाखल करू शकतो.  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसुद्धा पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची चर्चा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड आठवड्यात ही पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी एक निवेदनात म्हटलं आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही, परंतु त्याचा काहीही फरक पडणार नसून, आम्ही आमचा घटनात्मक अधिकार वापरणार आहोत, तसेच या अधिकाराच्या माध्यमातूनच ही याचिका दाखल करणार आहोत, असेही बोर्डाने सांगितलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त रामजन्मभूमी ही प्रभू श्रीरामाची आहे, असा निकाल दिला होता. तसेच मंदिराच्या बांधणीसाठी केंद्र सरकारने तीन महिन्यांच्या आत एक ट्रस्ट स्थापन करावी, असे आदेश दिले होते. 1989 मध्ये राम मंदिराचे भूमिपूजन झालेले असल्याने राम मंदिराचे बांधकाम सुरू करताना पुन्हा एकदा शीलापूजन करायचे की नाही याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही. उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी 5 एकर जमीन देण्यासाठी तीन ते चार भूखंड पाहून ठेवण्याचे आदेश अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जमीन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय