शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
7
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
8
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
9
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
10
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
12
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
13
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
14
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
15
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
16
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
18
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
19
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
20
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
Daily Top 2Weekly Top 5

"मोदींच्या गॅरेंटीवर देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास"; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितला नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:09 IST

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितलं की, आज मोदींची गॅरेंटी ही अशी गोष्ट आहे ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. गेल्या 10 वर्षांत देशात अनेक बदल झाले असून आता ते परदेश दौऱ्यावर असताना तेथील लोकांना देशातील बदलांबद्दल बोलायचं आहे, असा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे. "आज मोदींची गॅरेंटी अशी आहे की ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. मोदींची गॅरेंटी म्हणजे सुशासन, लोककेंद्रित धोरणे. याचा अर्थ असा की परदेशात कोणी संकटात सापडले असेल, मग ते सौदी अरेबिया, UAE मधील विद्यार्थी असोत किंवा युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी असोत, त्यांच्यासाठीही पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या 10 वर्षात हा मोठा बदल झाला आहे."

"जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा मी फक्त 10 मिनिटं आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करतो आणि उर्वरित वेळ लोक माझ्याशी फक्त भारताबद्दलच चर्चा करत असतात. भारतात काय बदललं? हा बदल कसा शक्य झाला? कारण जेव्हा तुम्ही आकडे बघता तेव्हा फूड प्लॅन म्हणजे ही एक अशी योजना आहे जी संपूर्ण अमेरिका आणि संपूर्ण युरोपला मिळून एकसाथ अन्न पुरवेल. त्यामुळेच आज भारताबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आदर आहे कारण ते बदल पाहत आहेत" असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत