शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

"मोदींच्या गॅरेंटीवर देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास"; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितला नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:09 IST

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितलं की, आज मोदींची गॅरेंटी ही अशी गोष्ट आहे ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. गेल्या 10 वर्षांत देशात अनेक बदल झाले असून आता ते परदेश दौऱ्यावर असताना तेथील लोकांना देशातील बदलांबद्दल बोलायचं आहे, असा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे. "आज मोदींची गॅरेंटी अशी आहे की ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. मोदींची गॅरेंटी म्हणजे सुशासन, लोककेंद्रित धोरणे. याचा अर्थ असा की परदेशात कोणी संकटात सापडले असेल, मग ते सौदी अरेबिया, UAE मधील विद्यार्थी असोत किंवा युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी असोत, त्यांच्यासाठीही पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या 10 वर्षात हा मोठा बदल झाला आहे."

"जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा मी फक्त 10 मिनिटं आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करतो आणि उर्वरित वेळ लोक माझ्याशी फक्त भारताबद्दलच चर्चा करत असतात. भारतात काय बदललं? हा बदल कसा शक्य झाला? कारण जेव्हा तुम्ही आकडे बघता तेव्हा फूड प्लॅन म्हणजे ही एक अशी योजना आहे जी संपूर्ण अमेरिका आणि संपूर्ण युरोपला मिळून एकसाथ अन्न पुरवेल. त्यामुळेच आज भारताबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आदर आहे कारण ते बदल पाहत आहेत" असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत