शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"मोदींच्या गॅरेंटीवर देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास"; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितला नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:09 IST

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितलं की, आज मोदींची गॅरेंटी ही अशी गोष्ट आहे ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. गेल्या 10 वर्षांत देशात अनेक बदल झाले असून आता ते परदेश दौऱ्यावर असताना तेथील लोकांना देशातील बदलांबद्दल बोलायचं आहे, असा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे. "आज मोदींची गॅरेंटी अशी आहे की ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. मोदींची गॅरेंटी म्हणजे सुशासन, लोककेंद्रित धोरणे. याचा अर्थ असा की परदेशात कोणी संकटात सापडले असेल, मग ते सौदी अरेबिया, UAE मधील विद्यार्थी असोत किंवा युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी असोत, त्यांच्यासाठीही पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या 10 वर्षात हा मोठा बदल झाला आहे."

"जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा मी फक्त 10 मिनिटं आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करतो आणि उर्वरित वेळ लोक माझ्याशी फक्त भारताबद्दलच चर्चा करत असतात. भारतात काय बदललं? हा बदल कसा शक्य झाला? कारण जेव्हा तुम्ही आकडे बघता तेव्हा फूड प्लॅन म्हणजे ही एक अशी योजना आहे जी संपूर्ण अमेरिका आणि संपूर्ण युरोपला मिळून एकसाथ अन्न पुरवेल. त्यामुळेच आज भारताबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आदर आहे कारण ते बदल पाहत आहेत" असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत