शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 10:00 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या जिव्हारी कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, कलम 370 हटवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी जैशने केली आहे. तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एक मेजर या हल्ल्याच्या तयारीसाठी जैशला मदत करत, असल्याचे गुप्तहेर संघटनांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीममधून समोर आले आहे. एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतावादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती एका  परदेशी दहशतवादी संघटनेला मिळाली. त्यानंतर या गुप्तहेर संघटनेने ही माहिती भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली.  दरम्यान, या गोपनीय माहितीच्या आधारावर जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह  एकूण 30 अत्यंत संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ते दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत.   दरम्यान, काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या एकेका दहशतवाद्याला शोधून शोधून टिपले आहे. त्यामुळे त्याचा खवळलेला जैशचा  म्होरक्या आपल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आसुसला आहे. दरम्यान,  5 ऑगस्टनंतर नियंत्रण रेषेवरून आत्मघाती दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र या घुसखोरीचे अनेक प्रयत्न सीमेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडले आहेत.  

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादीNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवाल