शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 10:00 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या जिव्हारी कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, कलम 370 हटवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी जैशने केली आहे. तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एक मेजर या हल्ल्याच्या तयारीसाठी जैशला मदत करत, असल्याचे गुप्तहेर संघटनांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीममधून समोर आले आहे. एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतावादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती एका  परदेशी दहशतवादी संघटनेला मिळाली. त्यानंतर या गुप्तहेर संघटनेने ही माहिती भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली.  दरम्यान, या गोपनीय माहितीच्या आधारावर जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह  एकूण 30 अत्यंत संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ते दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत.   दरम्यान, काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या एकेका दहशतवाद्याला शोधून शोधून टिपले आहे. त्यामुळे त्याचा खवळलेला जैशचा  म्होरक्या आपल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आसुसला आहे. दरम्यान,  5 ऑगस्टनंतर नियंत्रण रेषेवरून आत्मघाती दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र या घुसखोरीचे अनेक प्रयत्न सीमेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडले आहेत.  

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादीNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवाल