शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:37 IST

Jairam Ramesh on Nyay Yatra: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Jairam Ramesh Reply on Mamata Decision: सत्ताधारी NDA चा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. पण, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे INDIA आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. 

मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, 'कधी स्पीड ब्रेकर येतात, कधी रेड सिग्नल येतात. पण याचा अर्थ असा नाही की, प्रवास थांबला पाहिजे. आम्ही हे सर्व अडथळे पार करणार. काल राहुल गांधींना हाच प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि टीएमसीशिवाय आम्ही इंडिया आघाडीची कल्पना करू शकत नाही. ममतादेखील काल म्हणाल्या होत्या की, आम्ही भाजपचा पराभव करू. याच भावनेने आम्ही (काँग्रेस) बंगालमध्ये प्रवेश करत आहोत. मधला मार्ग नक्की सापडेल. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी निवडणूक लढवणार, त्यात सर्व पक्षांचे सहकार्य असेल.'

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'माझी काँग्रेस पक्षाशी जागा वाटपावार कोणतीही चर्चा झालेली नाही. मी नेहमीच म्हटले आहे की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि एकहाती भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उद्या, म्हणजेच 25 जानेवारी रोजी कूचबिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता काँग्रेसच्या यात्रेत ममता दाखल होणार का, हे पाहणे महत्वाचे आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा