शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीची शिक्षा असलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:36 IST

Bomb blast Case, High Court: मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमानसह एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते.

Jaipur Bomb blast Case, High Court: जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही दोषींना राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणातील मृत्यू संदर्भासह दोषींनी सादर केलेल्या 28 अपीलांवर न्यायालयाने आज निकाल दिला. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दोषींचे अपील मान्य करताना, त्यांच्या बाजूने दिलासा देणारा निर्णय दिला. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलेल्या अल्पवयीन मुलाचे प्रकरण ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवले आहे, तसेच इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

कनिष्ठ न्यायालयाने ठरवले होते दोषी

याआधी 2019 मध्ये जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने जयपूर बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देताना या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवले होते. आरोपींना UAPAच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्याच वेळी न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तताही केली होती. वास्तविक या प्रकरणात पाच आरोपी होते. 2019 मध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने सुनावणी केली तेव्हा त्यापैकी चार दोषी आढळले, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

2019 मध्ये न्यायालयाने या प्रकरणात आरोपी शाहबाज हुसेनची निर्दोष मुक्तता केली होती. तर मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमान आणि एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.

2008 मध्ये झाला होता जयपूरमधील बॉम्बस्फोट

2008 मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटानंतर राजस्थान सरकारने आरोपींना पकडण्यासाठी दहशतवादविरोधी पथक (ATS) स्थापन केले होते. या प्रकरणात जयपूरमधील चांदपोल हनुमान मंदिर, संगानेरी गेट हनुमान मंदिरासह अनेक ठिकाणी स्फोट झाले.

जयपूर मालिका स्फोट काय आहे?

13 मे 2008 रोजी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 बॉम्बस्फोटांनी संपूर्ण जयपूर हादरून गेला होता. या घटनेत 71 जणांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 176 जण जखमी झाले. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात ATS ने 11 दहशतवाद्यांची नावे दिली होती. या प्रकरणी एटीएस राजस्थानने पाच आरोपींना अटक केली होती. त्याचवेळी हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेललाही एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले. त्याचवेळी तीन आरोपी बराच काळ फरार होते तर दोन आरोपींचा मृत्यू झाला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयjaipur-pcजयपूरRajasthanराजस्थानBlastस्फोटCourtन्यायालय