शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

बॉम्बस्फोट खटल्यात हायकोर्टाने बदलला निर्णय; फाशीची शिक्षा असलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:36 IST

Bomb blast Case, High Court: मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमानसह एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते.

Jaipur Bomb blast Case, High Court: जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही दोषींना राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणातील मृत्यू संदर्भासह दोषींनी सादर केलेल्या 28 अपीलांवर न्यायालयाने आज निकाल दिला. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दोषींचे अपील मान्य करताना, त्यांच्या बाजूने दिलासा देणारा निर्णय दिला. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलेल्या अल्पवयीन मुलाचे प्रकरण ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवले आहे, तसेच इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

कनिष्ठ न्यायालयाने ठरवले होते दोषी

याआधी 2019 मध्ये जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने जयपूर बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देताना या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवले होते. आरोपींना UAPAच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्याच वेळी न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तताही केली होती. वास्तविक या प्रकरणात पाच आरोपी होते. 2019 मध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने सुनावणी केली तेव्हा त्यापैकी चार दोषी आढळले, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

2019 मध्ये न्यायालयाने या प्रकरणात आरोपी शाहबाज हुसेनची निर्दोष मुक्तता केली होती. तर मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमान आणि एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.

2008 मध्ये झाला होता जयपूरमधील बॉम्बस्फोट

2008 मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटानंतर राजस्थान सरकारने आरोपींना पकडण्यासाठी दहशतवादविरोधी पथक (ATS) स्थापन केले होते. या प्रकरणात जयपूरमधील चांदपोल हनुमान मंदिर, संगानेरी गेट हनुमान मंदिरासह अनेक ठिकाणी स्फोट झाले.

जयपूर मालिका स्फोट काय आहे?

13 मे 2008 रोजी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 8 बॉम्बस्फोटांनी संपूर्ण जयपूर हादरून गेला होता. या घटनेत 71 जणांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 176 जण जखमी झाले. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात ATS ने 11 दहशतवाद्यांची नावे दिली होती. या प्रकरणी एटीएस राजस्थानने पाच आरोपींना अटक केली होती. त्याचवेळी हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेललाही एका दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले. त्याचवेळी तीन आरोपी बराच काळ फरार होते तर दोन आरोपींचा मृत्यू झाला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयjaipur-pcजयपूरRajasthanराजस्थानBlastस्फोटCourtन्यायालय