शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूची ‘ती’ ४० मिनिटं...आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; आकाशातून कोसळलं ‘वीज’संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:50 IST

मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते.

जयपूर – गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. यातच विजांचा कडकडाटही होत आहे. आकाशातून जमिनीवर कोसळणाऱ्या या संकटामुळे जयपूरमध्ये कहर माजला आहे. आमेर वॉच टॉवर येथे आकाशातून वीज कोसळल्याने आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झालेत. सध्या याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते. पर्यटनस्थळ असल्याने अनेक जण सेल्फी घेत होते. प्रत्येक जणांचे चेहरे आनंदीत होते. पण पुढे येणाऱ्या संकटाबाबत सगळेच अनभिज्ञ होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या मित्रांसोबत त्याठिकाणी गेलो होतो. आम्ही सेल्फी घेत नव्हतो परंतु इतर सगळे सेल्फी घेत होते. ४० मिनिटांच्या कालावधीत अनेकदा वीज कोसळली.

लोक ज्याठिकाणी उभे होते तिथेच खाली पडले. आमेरमध्ये आलेल्या संकटात सापडलेल्या पीडित इजहार अलीने सांगितले की, जेव्हा वीज कोसळली तेव्हा मी वॉच टॉवरवरच होतो. मी खाली पडलो पण २० मिनिटानंतर पुन्हा मला शुद्ध आली. त्यानंतर काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. राजस्थान सरकारने सांगितले की, आम्ही कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार आहोत. जे मृत झालेत त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ४ लाखांची मदत करण्यात येणार आहे. SDRF आणि राज्य पोलिसांची ५ टीम रविवारी रात्री सर्च ऑपरेशन करत आहेत. आतापर्यंत ११ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. तर १५ जखमी आहेत. राज्यात आतापर्यंत वीज कोसळल्यानंतर २० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी राजस्थान सरकारने दिली आहे.   

टॅग्स :Rajasthanराजस्थान