शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मृत्यूची ‘ती’ ४० मिनिटं...आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; आकाशातून कोसळलं ‘वीज’संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:50 IST

मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते.

जयपूर – गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. यातच विजांचा कडकडाटही होत आहे. आकाशातून जमिनीवर कोसळणाऱ्या या संकटामुळे जयपूरमध्ये कहर माजला आहे. आमेर वॉच टॉवर येथे आकाशातून वीज कोसळल्याने आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झालेत. सध्या याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐतिहासिक आमेर किल्ल्याच्या समोर असलेल्या ५०० मीटर उंचीवरील आमेर वॉच टॉवरवर जवळपास ४० लोक एकत्रित आले होते. पर्यटनस्थळ असल्याने अनेक जण सेल्फी घेत होते. प्रत्येक जणांचे चेहरे आनंदीत होते. पण पुढे येणाऱ्या संकटाबाबत सगळेच अनभिज्ञ होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या मित्रांसोबत त्याठिकाणी गेलो होतो. आम्ही सेल्फी घेत नव्हतो परंतु इतर सगळे सेल्फी घेत होते. ४० मिनिटांच्या कालावधीत अनेकदा वीज कोसळली.

लोक ज्याठिकाणी उभे होते तिथेच खाली पडले. आमेरमध्ये आलेल्या संकटात सापडलेल्या पीडित इजहार अलीने सांगितले की, जेव्हा वीज कोसळली तेव्हा मी वॉच टॉवरवरच होतो. मी खाली पडलो पण २० मिनिटानंतर पुन्हा मला शुद्ध आली. त्यानंतर काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. राजस्थान सरकारने सांगितले की, आम्ही कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार आहोत. जे मृत झालेत त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ४ लाखांची मदत करण्यात येणार आहे. SDRF आणि राज्य पोलिसांची ५ टीम रविवारी रात्री सर्च ऑपरेशन करत आहेत. आतापर्यंत ११ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. तर १५ जखमी आहेत. राज्यात आतापर्यंत वीज कोसळल्यानंतर २० लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी राजस्थान सरकारने दिली आहे.   

टॅग्स :Rajasthanराजस्थान