शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम! बंगालमध्ये ममता आणि भाजपाच्या लढाईत पोस्ट खात्याचं वाढलं काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:12 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. ममता बॅनर्जींसमोर जय श्रीराम म्हटल्याने काही जणांवर कारवाई केली गेल्याच्या निषेधार्थ भाजपाने ममता बॅनर्जींना जय श्रीराम असा उल्लेख असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर तृणमूल काँग्रेसकडून जय हिंद जय बांगला या घोषवाक्याद्वारे जय श्रीरामला प्रत्युत्तर दिले जात आहे.पण दोन्ही पक्षांमध्ये पत्रांद्वारे सुरू असलेल्या शीतयुद्धात पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांची मात्र पळापळ होत आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात जय श्रीराम हा नारा देण्यास सुरुवात केली होती. अगदी समोरासमोर या घोषणा दिल्या गेल्याने ममता बॅनर्जी यांचा तीळपापड झाल्याचेही अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले होते. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जींच्या पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवण्यात येत असल्याने ममता बॅनर्जींचे निवासस्थान असलेल्या दक्षिण कोलकात्यामधील कालीघाट पोस्ट ऑफीसमध्ये दररोज हजारो पत्रांचा ढीग जमत आहे. पोस्ट खात्यामधील कर्मचाऱ्यांसाठी पोस्टकार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येक पत्राला कर्मचाऱ्यांकडून सुनियोजित पद्धतीने हाताळले जाते. दरम्यान, पोस्ट ऑफीसमधील सूत्रांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांना सरासरी 30 ते 40 पत्रे आणि रजिस्टर पत्रे येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांना येणाऱ्या पत्रांची संख्या अचानक वाढली आहे. सध्या ममता बॅनर्जींना येणाऱ्या पत्रांची संख्या ही या पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या एकूण पत्रसंख्येपैकी दहा टक्के आहे.  दरम्यान, ममता बॅनर्जींच्या नावे येणारी पत्रे त्यांच्या निवासस्थानी पोच करण्यासाठी खास एका पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पोस्टमन ही पत्रे घेऊन रोज ममतांच्या निवासस्थानी येतो आणि संबंधित व्यक्तिकडे देऊन निघून जातो, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, रेल्वे मेल सर्व्हिसनेसुद्धा ममता बॅनर्जींसाठी आलेली सुमारे 4 हजार 500 पत्रे वेगळी केली आहेत. तसेच या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जीं संतप्त झाल्या असून, त्यांच्याकडूनही पोस्ट कार्डला पोस्ट कार्डने प्रत्युत्तर देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. जय श्रीराम ऐवजी जय हिंद, जय बांगला असे उल्लेख असलेली पोस्टकार्ड तृणमूलकडून नरेंद्र मोदींना पाठवण्यातच येत आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण