शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 23:10 IST

Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. यावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.

तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. मंगलगिरी येथील जनसेना पक्ष कार्यालयात पवन कल्याण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यावेळी ते (रेड्डी) माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते इतकेच म्हणू शकले असते की, जो कोणी दोषी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याचे मन शुद्ध असेल तर हे सर्व नाटक करण्याची गरज नाही, असे पवन कल्याण यांनी म्हटले.

पुढे पवन कल्याण म्हणाले की, रेड्डी यांनी स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाच्या देखरेखीखाली हा कथित घोटाळा झाला होता. टीटीडी हे तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे. तसेच, रेड्डी यांना दोष देत नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या, म्हणून रेड्डी यांनी सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारच्या अंतर्गत व्यवस्थेला आपले काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सांगितले.

चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आरोपआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली आहे.

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश