शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 23:10 IST

Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. यावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.

तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. मंगलगिरी येथील जनसेना पक्ष कार्यालयात पवन कल्याण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यावेळी ते (रेड्डी) माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते इतकेच म्हणू शकले असते की, जो कोणी दोषी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याचे मन शुद्ध असेल तर हे सर्व नाटक करण्याची गरज नाही, असे पवन कल्याण यांनी म्हटले.

पुढे पवन कल्याण म्हणाले की, रेड्डी यांनी स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाच्या देखरेखीखाली हा कथित घोटाळा झाला होता. टीटीडी हे तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे. तसेच, रेड्डी यांना दोष देत नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या, म्हणून रेड्डी यांनी सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारच्या अंतर्गत व्यवस्थेला आपले काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सांगितले.

चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आरोपआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली आहे.

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश