शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 23:10 IST

Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. यावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे.

तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. मंगलगिरी येथील जनसेना पक्ष कार्यालयात पवन कल्याण यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत संवाद साधला. यावेळी ते (रेड्डी) माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते इतकेच म्हणू शकले असते की, जो कोणी दोषी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याचे मन शुद्ध असेल तर हे सर्व नाटक करण्याची गरज नाही, असे पवन कल्याण यांनी म्हटले.

पुढे पवन कल्याण म्हणाले की, रेड्डी यांनी स्थापन केलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाच्या देखरेखीखाली हा कथित घोटाळा झाला होता. टीटीडी हे तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे. तसेच, रेड्डी यांना दोष देत नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लाडूंमध्ये भेसळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या, म्हणून रेड्डी यांनी सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारच्या अंतर्गत व्यवस्थेला आपले काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सांगितले.

चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आरोपआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली आहे.

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश