देशासाठी जगेन-मोदी
By Admin | Updated: May 21, 2014 04:11 IST2014-05-21T04:11:13+5:302014-05-21T04:11:13+5:30
आपण सोपवलेली जबाबदारी मी स्वीकारतो़ माझ्या सरकारमुळे आपल्याला कधीही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही़ सामान्य लोकांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे़

देशासाठी जगेन-मोदी
आपण सोपवलेली जबाबदारी मी स्वीकारतो़ माझ्या सरकारमुळे आपल्याला कधीही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही़ सामान्य लोकांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली आहे़ देशाच्या मतदारांनी आशा आणि विश्वासापोटीच मतदान केल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले़ भाजपा सरकारच्या अखेरच्या दिवसापर्यंत हे सरकार कुणाचे असेल? ते फक्त गरिबांसाठीचे असेल़ कोट्यवधी युवा आणि माता आणि भगिनींच्या सुरक्षेसाठी असेल, ग्रामीण भागातील उपेक्षित आणि वंचितांसाठी असेल़ निवडणूक निकालांचे वेगळ्या प्रकारे मूल्यांकन होत आहे़ जनतेने त्रिशंकू वा विभाजित जनादेश दिला असता तर तो सरकारविरोधी संतापातून दिलेला जनादेश मानता आला असता़ पण भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे़ याचा अर्थ लोकांनी आशा आणि विश्वासाने मतदान केले. जनतेच्या या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यास आम्ही सर्वकाही करणाऱ इथे निराशेला कुठलेही स्थान नाही़ प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाचा विकास हे नव्या सरकारचे ध्येय आहे़ माझे सरकार फक्त माझ्यासाठी असणार नाही, तर ते संपूर्ण देशासाठी असेल़ सरकार गरिबांसाठी आहे आणि आम्हाला त्यांच्यासाठी काही करायचे आहे़ आज अटलजी प्रकृती कारणास्तव बैठकीला येऊ शकले नाहीत. ते हजर असते तर सोन्याहून पिवळे झाले असते़ त्यांचा आशीर्वाद होता आणि यापुढे राहील़ जबाबदारीच्या एका युगाचा प्रारंभ झाला आहे कारण जनतेला माझ्याकडून अपार आशा आहेत़ मुलगा कधी आईवर कृपा करू शकतो का? तो केवळ आईची सेवा करतो़ भारत माझी आई आहे; तसेच भाजपा माझी आई आहे़ म्हणूनच मी कधीच भाजपावर ‘कृपा’ करू शकत नाही़ कृपा तर पक्षाने माझ्यावर केली व मला माउलीची सेवा करायची संधी दिली़ आपण आज लोकशाहीच्या मंदिरात आहोत़ आपण सर्व निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करू. पदासाठी नाही, तर देशातील जनतेच्या सेवेसाठी़ कार्य, जबाबदारी सर्वांत मोठी गोष्ट आहे़ गतवर्षी १३ सप्टेंबरला पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवून भाजपाने माझ्यावर जबाबदारी सोवपली़ ती पूर्ण करण्यास शरीराचा प्रत्येक कण आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी समर्पित केला होता़ १० मे रोजी निवडणूक प्रचार संपल्यावर पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांना मी माझे रिपोर्ट कार्ड सादर केले होते़ २०१९मध्ये माझ्या सरकारचे असेच रिपोर्ट कार्ड खासदार, पक्ष आणि देशाला सादर करेन.मी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलो तेव्हाच मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य विधानसभा बघितली़ तेच आज झाले़ मी प्रथमच हा सेंट्रल हॉल पाहिला. पूर्वीच्या सरकारांनी काहीच केले नाही, असे मी म्हणत नाही़ प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केला़ त्या सगळ्या सरकारला त्यांच्या उपलब्धींसाठी मी शुभेच्छा देतो़ जे काही चांगले आहे ते पुढे नेल्याने देश सामर्थ्यवान होईल़ देशाजवळ अपार क्षमता आहे़ सर्व देशवासी एक पाऊल चालले तर हा देश १२५ कोटी पावले पुढे जाऊ शकतो़ मी आशावादी आहे़ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जावे लागेल़ प्रत्येकात शक्ती आहे़ या प्रत्येकाला नव्या सरकारला संधी द्यायची आहे़ ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन पुढे जायचे आहे़ मला चांगले सोबती-सहकारी लाभले आहेत़ त्यांच्याबाबत माझ्याकडे तक्रारी येतील असे मला वाटत नाही़ गेल्या काही महिन्यांपासून मोदी दिसत आहेत़ पण हा माझा मोठेपणा नाही, तर पक्षातील नेत्यांचा मोठेपणा आहे़ आज मिळालेला विजय हा पाच पिढ्यांच्या तपाचे फळ आहे़