शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 10:54 IST

शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली.

जबलपूरच्या गोरखपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामपूरच्या एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर ही माहिती संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. आजारी मुलांना घाईघाईने सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण फूड पॉयझनिंगशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात सुमारे 450 मुलं राहतात. येथे राहणाऱ्या मुलांनी संध्याकाळी फणसाची भाजी खाल्ली होती. अन्न खाल्ल्याबरोबर मुलांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहने बोलावून आजारी मुलांना रुग्णालयात पाठवलं. आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या एवढी जास्त होती की त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणं शक्य नव्हतं.

100 हून अधिक मुलं पडली आजारी

मोठ्या संख्येने आजारी पडलेल्या मुलांपैकी काही मुलांना शास्त्री पुलावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही मुलांना व्हिक्टोरिया आणि मेडिकल हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी नेण्यात आले. सिव्हिल सर्जन मनीष मिश्रा यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झालेल्या अनेक बालकांची गंभीर स्थिती पाहता त्यांना आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सुमारे 100 मुले आजारी पडल्याची माहिती मिळाली.

वसतीगृह व्यवस्थापनावर आरोप

मुलांचे कुटुंबीयही माहिती मिळताच रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी वसतीगृह व्यवस्थापनावर त्यांना मेनूनुसार जेवण न दिल्याचा आरोप केला आहे. शाळा व्यवस्थापन मुलांची योग्य काळजी घेत नसून त्यांच्याकडे तक्रार केली असता ते त्यांच्याशी नीट बोलतही नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, शहरातील अनेक रुग्णालयात आजारी बालकांवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी