शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 10:54 IST

शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली.

जबलपूरच्या गोरखपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामपूरच्या एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर ही माहिती संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. आजारी मुलांना घाईघाईने सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण फूड पॉयझनिंगशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात सुमारे 450 मुलं राहतात. येथे राहणाऱ्या मुलांनी संध्याकाळी फणसाची भाजी खाल्ली होती. अन्न खाल्ल्याबरोबर मुलांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहने बोलावून आजारी मुलांना रुग्णालयात पाठवलं. आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या एवढी जास्त होती की त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणं शक्य नव्हतं.

100 हून अधिक मुलं पडली आजारी

मोठ्या संख्येने आजारी पडलेल्या मुलांपैकी काही मुलांना शास्त्री पुलावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही मुलांना व्हिक्टोरिया आणि मेडिकल हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी नेण्यात आले. सिव्हिल सर्जन मनीष मिश्रा यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झालेल्या अनेक बालकांची गंभीर स्थिती पाहता त्यांना आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सुमारे 100 मुले आजारी पडल्याची माहिती मिळाली.

वसतीगृह व्यवस्थापनावर आरोप

मुलांचे कुटुंबीयही माहिती मिळताच रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी वसतीगृह व्यवस्थापनावर त्यांना मेनूनुसार जेवण न दिल्याचा आरोप केला आहे. शाळा व्यवस्थापन मुलांची योग्य काळजी घेत नसून त्यांच्याकडे तक्रार केली असता ते त्यांच्याशी नीट बोलतही नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, शहरातील अनेक रुग्णालयात आजारी बालकांवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी