शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 10:54 IST

शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली.

जबलपूरच्या गोरखपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामपूरच्या एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर ही माहिती संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. आजारी मुलांना घाईघाईने सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण फूड पॉयझनिंगशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य आदर्श निवासी शाळेच्या वसतिगृहात सुमारे 450 मुलं राहतात. येथे राहणाऱ्या मुलांनी संध्याकाळी फणसाची भाजी खाल्ली होती. अन्न खाल्ल्याबरोबर मुलांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहने बोलावून आजारी मुलांना रुग्णालयात पाठवलं. आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या एवढी जास्त होती की त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणं शक्य नव्हतं.

100 हून अधिक मुलं पडली आजारी

मोठ्या संख्येने आजारी पडलेल्या मुलांपैकी काही मुलांना शास्त्री पुलावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही मुलांना व्हिक्टोरिया आणि मेडिकल हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी नेण्यात आले. सिव्हिल सर्जन मनीष मिश्रा यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झालेल्या अनेक बालकांची गंभीर स्थिती पाहता त्यांना आयसीसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सुमारे 100 मुले आजारी पडल्याची माहिती मिळाली.

वसतीगृह व्यवस्थापनावर आरोप

मुलांचे कुटुंबीयही माहिती मिळताच रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी वसतीगृह व्यवस्थापनावर त्यांना मेनूनुसार जेवण न दिल्याचा आरोप केला आहे. शाळा व्यवस्थापन मुलांची योग्य काळजी घेत नसून त्यांच्याकडे तक्रार केली असता ते त्यांच्याशी नीट बोलतही नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, शहरातील अनेक रुग्णालयात आजारी बालकांवर उपचार सुरू असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी