शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:43 IST

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत

गुवाहटी - भंडारी दास ही महिला जवळपास 1967 मध्ये बांग्लादेशहून आपल्या पती आणि दोन मुलांसह भारतात आली. तत्कालीन परिस्थितीत धार्मिक हिंसाचारात झालेल्या वाताहतीतून बचाव करण्यासाठी हे कुटुंब भारतात आलं. तेव्हापासून आसामच्या कछार जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात भंडारी दास या आपल्या कुटुंबासमेवत राहत आहेत. मात्र, 54 वर्षांनंतरही 80 वर्षीय भंडारी दास आणि त्यांच्या कुटुंबीयांस विदेशी मानले जात आहे. 

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. तर, भारतीय नागरिक बनण्यासाठी आणखी 10 वर्षे वाट पाहावी लागेल. पण, माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी कधी भारतीय नागरिक बनेल, असे मला वाटत नाही, असे भंडारी यांनी म्हटलं आहे. विधवा असलेल्या भंडारी यांचं वय 80 वर्षे असून त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत. 

सिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत. आसाम कराराच्या अनुच्छेद 5 अनुसार वाहणारे विदेशी किंवा आलेले विदेशी, ज्यांनी 1 जानेवारी 1966 आणि 24 मार्च 1971 च्या दरम्यान भारतात प्रवेश केला आहे. या विदेशी नागरिकांना एफआरएरओचे नोंदणीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, व भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांना 10 वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे, मतदान प्रक्रियेत या नागरिकांना सहभागी होता येणार नाही. 

दरम्यान, 2008 साली भंडारी दास यांचे प्रकरण विदेशी न्याय प्राधिकरणाकडे आले होते. भारतात आल्यानंतर 41 वर्षांनी सीमा रेषेवरील पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता, असे दास यांच्या वकिलांनी सांगितले.  

टॅग्स :AssamआसामBangladeshबांगलादेशWomenमहिलाCourtन्यायालयIndiaभारतVotingमतदान