शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:43 IST

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत

गुवाहटी - भंडारी दास ही महिला जवळपास 1967 मध्ये बांग्लादेशहून आपल्या पती आणि दोन मुलांसह भारतात आली. तत्कालीन परिस्थितीत धार्मिक हिंसाचारात झालेल्या वाताहतीतून बचाव करण्यासाठी हे कुटुंब भारतात आलं. तेव्हापासून आसामच्या कछार जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात भंडारी दास या आपल्या कुटुंबासमेवत राहत आहेत. मात्र, 54 वर्षांनंतरही 80 वर्षीय भंडारी दास आणि त्यांच्या कुटुंबीयांस विदेशी मानले जात आहे. 

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. तर, भारतीय नागरिक बनण्यासाठी आणखी 10 वर्षे वाट पाहावी लागेल. पण, माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी कधी भारतीय नागरिक बनेल, असे मला वाटत नाही, असे भंडारी यांनी म्हटलं आहे. विधवा असलेल्या भंडारी यांचं वय 80 वर्षे असून त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत. 

सिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत. आसाम कराराच्या अनुच्छेद 5 अनुसार वाहणारे विदेशी किंवा आलेले विदेशी, ज्यांनी 1 जानेवारी 1966 आणि 24 मार्च 1971 च्या दरम्यान भारतात प्रवेश केला आहे. या विदेशी नागरिकांना एफआरएरओचे नोंदणीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, व भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांना 10 वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे, मतदान प्रक्रियेत या नागरिकांना सहभागी होता येणार नाही. 

दरम्यान, 2008 साली भंडारी दास यांचे प्रकरण विदेशी न्याय प्राधिकरणाकडे आले होते. भारतात आल्यानंतर 41 वर्षांनी सीमा रेषेवरील पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता, असे दास यांच्या वकिलांनी सांगितले.  

टॅग्स :AssamआसामBangladeshबांगलादेशWomenमहिलाCourtन्यायालयIndiaभारतVotingमतदान