शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हे तर आपचे नकारात्मक राजकारण, गौतम गंभीरचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 15:17 IST

दोन मतदार ओळखपत्रे सोबत बाळगल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेला माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली - दोन मतदार ओळखपत्रे सोबत बाळगल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेला माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. साडे चार वर्षांत दिल्लीमध्ये काही विशेष करता न आल्याने आपकडून नकारात्मक राजकारण करण्यात येत आहे. आता या आरोपाबाबत निवडणूक आयोगच काय तो अंतिम निर्णय घेईल, असे गंभीरने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचे आव्हान आहे. दरम्यान, गौतम गंभीरजवळ राजेंद्र नगर आणि करोल बागमधील दोन मतदान कार्ड आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्याला एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाला की, ''जेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे व्हिजन नसते. तसेच तुम्ही साडे चार वर्षांत काहीही काम केलेले नसते तेव्हा तुम्ही असे नकारात्मक आरोप करू लागता.आता यावर निवडणूक आयोगच निर्णय घेईल. मात्र जेव्हा तुमच्याकडे व्हिजन असते तेव्हा तुम्हाला नकारात्मक राजकारण करावे लागत नाही,'' असा टोला गौतम गंभीरने लगावला. 

दरम्यान, पूर्व दिल्लीमध्ये विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. तर गंभीरने नाव दोन ठिकाणी असल्याच्या विरोधात आपने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती. यावर 1 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019east-delhi-pcपूर्व दिल्ली