शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

‘आयटीआय’ला मिळणार बारावीची समकक्षता ?

By admin | Updated: March 9, 2016 06:18 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणातील इयत्ता १२वीशी समकक्षता देण्यावर केंद्र सरकार सध्या विचार करीत आहे.

नवी दिल्ली : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणातील इयत्ता १२वीशी समकक्षता देण्यावर केंद्र सरकार सध्या विचार करीत आहे.असे झाले, तर ‘आयटीआय’मधील शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी महाविद्यालये अथवा विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरतील. मात्र, यासाठी दोन्ही अभ्यासक्रमांमधील तफावत भरून काढण्यासाठी कदाचित अशा विद्यार्थ्यांना एखादा पुरवणी अभ्यासक्रमही (ब्रिज कोर्स) करावा लागू शकेल. सूत्रांनुसार, कौशल्यविकास आणि उद्योजकता विकास मंत्रालयाने अशा आशयाचा प्रस्ताव मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविला असून, त्यावर कौशल्य विकास कार्यक्रमाशी संबंधित इतर मंत्रालयांचीही मते घेण्यात येत आहेत.‘आयटीआय’ कौशल्यविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. या मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना जाता यावे, यासाठी ‘आयटीआय’चा अभ्यासक्रम इयत्ता १२ वीशी समकक्ष मानला जावा, असे आम्हाला वाटते. आम्ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासही (सीबीएसई) तसे सांगितले आहे.या प्रस्तावावर शिक्षण मंडळांसह इतर सर्व संबंधितांशी व्यापक विचारविनिमय व्हायला हवा, असे मानव संसाधन विकास मंत्रालयास वाटते. हा प्रस्ताव प्रत्यक्षात कसा आणता येईल, याच्या औपचारिकता ठरविण्यासाठी मानव संसाधन व कौशल्यविकास या मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांचा एक कार्यगट स्थापन करण्यात आला असून, लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी त्या राज्यापुरता ‘आयटीआय’ अभ्यासक्रम इयत्ता १२ वीला समकक्ष करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनांमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकले होते.देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये व आयआयटी आणि एनआयटी यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असून, सरकारी व खासगी संस्थांमधील अभियांत्रिकी पदवीच्या सुमारे आठ लाख जागा सध्या विद्यार्थ्यांअभावी रिकाम्या राहात आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणानंतर कौशल्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आयटीआयना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)