शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आयटीसी चेअरमन वाय. सी. देवेश्वर काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:41 IST

प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुरुवातीला मुख्यत: सिगारेट उत्पादन क्षेत्रात असलेल्या आयटीसीने देवेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एफएमसीजी, आतिथ्य, आयटी आणि इतर अनेक क्षेत्रात यशस्वी झेप घेतली.७२ वर्षीय देवेश्वर हे २०१७ मध्येच कंपनीच्या सक्रिय चेअरमन व सीईओपदावरून पायउतार झाले होते. तथापि, अ-कार्यकारी चेअरमन म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत संचालक मंडळावर होते. गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेश्वर यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.आयटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी सांगितले की, ‘आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांच्या निधनाबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करीत आहोत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनी भरभराटीला आली. त्यांचे व्यावसायिक मॉडेल आज ६ दशलक्ष लोकांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे.’देवेश्वर यांनी १९६८ मध्ये आयटीसीमध्ये प्रवेश केला होता. ११ एप्रिल १९८४ रोजी त्यांना संचालक मंडळावर घेण्यात आले. १ जानेवारी १९९६ रोजी ते कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि चेअरमन बनले. उद्योगजगतातील दीर्घकाळपर्यंत सर्वोच्च कार्यकारी पदावर काम करणाऱ्या मोजक्या लोकांत त्यांचा समावेश होतो. आयटीसी ही मुख्यत: सिगारेटचे उत्पादन करीत असे. देवेश्वर यांनी कंपनीला एफएमसीजी, आतिथ्य, कागद, कृषी आणि माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात उतरवून यशस्वीही केले.देवेश्वर यांनी कंपनीचा ताबा घेतला, तेव्हा कंपनीचा महसूल ५,२०० कोटींपेक्षही कमी होता, तर करपूर्व नफा अवघा ४५२ कोटी रुपये होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनी भरभराटीला आली. २०१७-१८ मध्ये कंपनीचा महसूल ४४,३२९.७७ कोटी आणि शुद्ध नफा ११,२२३.२५ कोटी रुपयांवर गेला.

टॅग्स :Deathमृत्यू