शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 22:17 IST

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे.

माजी निवडणूक रणनीतीकार तथा जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. तसेच, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळीही ते पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकता, अशे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते. यावेळी, काँग्रेस या निवडणुकीत 100 चा आकडा पार करेल का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांच्या संख्येत मोठा बदल होण्याची शक्यता नाही. जागांची संख्या 50-55 झाली तर देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र, काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नाही. आजच्या घडीला हे अवघड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'भाजपच्या 370 वर काय म्हणाले प्रशांत किशो' -भाजपच्या 370 जागांच्या लक्ष्यासंदर्भात विचारले असता किशोर म्हणाले, "भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले लक्ष्य निर्धारित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर ते खूप छान, मात्र हे शक्य झाले नाही, तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत विनम्र असायला हवे." किशोर यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

'भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात काय म्हणाले पीके? -प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप एकट्याच्या बळावर 370 जागा मिळवू शकणार नाही, असे मी म्हणू शकतो. मी, ही शक्यता जवळजवळ शून्य मानतो. असे घडल्यास मला आश्चर्य वाटेल. किशोर म्हणाले, संदेशखालीसारख्या घटना घडल्यास, ते सत्ताधारी पक्षासाठी निश्चितपणे नुकसानाचे कारण ठरेल. महत्वाचे म्हणजे, त्यांचे म्हणणे होते की, भाजप 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या जागांवरून खाली येणार नाही. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'बाबत किशोर म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ आली असताना, ही यात्रेची वेळ नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण