शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 22:17 IST

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे.

माजी निवडणूक रणनीतीकार तथा जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. तसेच, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळीही ते पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकता, अशे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते. यावेळी, काँग्रेस या निवडणुकीत 100 चा आकडा पार करेल का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांच्या संख्येत मोठा बदल होण्याची शक्यता नाही. जागांची संख्या 50-55 झाली तर देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र, काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नाही. आजच्या घडीला हे अवघड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'भाजपच्या 370 वर काय म्हणाले प्रशांत किशो' -भाजपच्या 370 जागांच्या लक्ष्यासंदर्भात विचारले असता किशोर म्हणाले, "भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले लक्ष्य निर्धारित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर ते खूप छान, मात्र हे शक्य झाले नाही, तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत विनम्र असायला हवे." किशोर यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

'भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात काय म्हणाले पीके? -प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप एकट्याच्या बळावर 370 जागा मिळवू शकणार नाही, असे मी म्हणू शकतो. मी, ही शक्यता जवळजवळ शून्य मानतो. असे घडल्यास मला आश्चर्य वाटेल. किशोर म्हणाले, संदेशखालीसारख्या घटना घडल्यास, ते सत्ताधारी पक्षासाठी निश्चितपणे नुकसानाचे कारण ठरेल. महत्वाचे म्हणजे, त्यांचे म्हणणे होते की, भाजप 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या जागांवरून खाली येणार नाही. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'बाबत किशोर म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ आली असताना, ही यात्रेची वेळ नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण