शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 22:17 IST

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे.

माजी निवडणूक रणनीतीकार तथा जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. तसेच, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळीही ते पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकता, अशे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते. यावेळी, काँग्रेस या निवडणुकीत 100 चा आकडा पार करेल का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांच्या संख्येत मोठा बदल होण्याची शक्यता नाही. जागांची संख्या 50-55 झाली तर देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र, काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नाही. आजच्या घडीला हे अवघड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'भाजपच्या 370 वर काय म्हणाले प्रशांत किशो' -भाजपच्या 370 जागांच्या लक्ष्यासंदर्भात विचारले असता किशोर म्हणाले, "भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले लक्ष्य निर्धारित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर ते खूप छान, मात्र हे शक्य झाले नाही, तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत विनम्र असायला हवे." किशोर यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

'भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात काय म्हणाले पीके? -प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप एकट्याच्या बळावर 370 जागा मिळवू शकणार नाही, असे मी म्हणू शकतो. मी, ही शक्यता जवळजवळ शून्य मानतो. असे घडल्यास मला आश्चर्य वाटेल. किशोर म्हणाले, संदेशखालीसारख्या घटना घडल्यास, ते सत्ताधारी पक्षासाठी निश्चितपणे नुकसानाचे कारण ठरेल. महत्वाचे म्हणजे, त्यांचे म्हणणे होते की, भाजप 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या जागांवरून खाली येणार नाही. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'बाबत किशोर म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ आली असताना, ही यात्रेची वेळ नाही.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण