शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'खराब इंजिन होते, पण बदलले डब्बे, मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारावर बोचरी टीका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 10:19 IST

मोदी सरकारमधील प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून काढण्यात आलं आहे

ठळक मुद्देबिहारचे नेते असलेल्या आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबई - मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होऊन 43 मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये 15 जणांनी कॅबिनेट तर 28 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना डच्चू देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी 12 जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यावरुन, काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. 

मोदी सरकारमधील प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून काढण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "बिचारे डॉ. हर्षवर्धन... 'बळीचा बकरा' ठरले" अशा शब्दांत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हल्लाबोल केला आहे. त्यानंतर, बिहारमधील काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावर बोचरी टीका केली आहे. 'खराब तर इंजिने होते, पण डब्बे बदलण्यात आले,' असे म्हणत किर्ती आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. 

बिहारचे नेते असलेल्या आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपात असताना त्यांनी मंत्रीपदही सांभाळले होते. आझाद यांनी २०१४ मध्ये चार वेळा खासदार असलेले मोहम्मद अली अश्रफ फादमी यांचा ३४,००० मतांनी पराभव केला होता. तर, दे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

नारायण राणेंना कॅबिनेटचा दर्जा

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता 78 जणांचे झाले असून त्यात 38 नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस