शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

देशाला वाचविण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल, हीच ती वेळ - सोनिया गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:52 IST

आज महिलांवर होणारे गुन्हे पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेर नगरी चौपट राजा असं वातावरण देशात आहे.

नवी दिल्ली - देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, देशाच्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती गंभीर झाल्याने आपण सर्वजण येथे आलो आहोत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. आपण घराबाहेर पडून त्याविरोधात आंदोलन करणे ही आपली जबाबदारी आहे. आज तीच वेळ आहे. देश वाचविण्यासाठी आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरुन केलं आहे. भारत बचाव रॅलीत त्या बोलत होत्या. 

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, तुम्ही बदलासाठी तयार आहात का? आज जेव्हा मी शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी बियाणे मिळत नाहीत, त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही. पिकांना वाजवी किंमत नाही. आमचे कामगार बांधव दिवसभर मजुरीमध्ये गुंतलेले असतात. ते हिवाळा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता काम करत राहतात. तरीही त्यांना 2 वेळची भाकरी मिळत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना बँक कर्ज देण्यास सक्षम नाहीत, संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आज आमचे तरुण अशा बेरोजगारीला तोंड देत आहे जी यापूर्वी कधीही आली नाही. नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर अंधार आहे असा घणाघात सोनियांनी केला. 

तसेच आज महिलांवर होणारे गुन्हे पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेर नगरी चौपट राजा असं वातावरण देशात आहे. सबका साथ सबका विकास कुठे आहे असा प्रश्न प्रत्येकजण करतोय. रोजगार कुठे गेला? अर्थव्यवस्था का नष्ट झाली? तुम्ही मला सांगा की काळा पैसा आणण्यासाठी आणलेल्या नोटाबंदीमुळे काळा पैसा का बाहेर पडला नाही याची चौकशी झाली पाहिजे. ते काळा पैसा कोणाकडे आहे? जीएसटीनंतरही मोदी सरकारची तिजोरी रिकामी का झाली? देशासाठी फायदेशीर असलेल्या कंपन्या कशा विकल्या जात आहेत आणि कोणाकडे? बँकांमध्येही सार्वजनिक पैसे सुरक्षित नाहीत असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले. 

त्याचसोबत मोदी-शहा म्हणतात हे अच्छे दिन आहेत. मात्र आजचे वातावरण असं झाले आहे की जेव्हा मनात येईल तेव्हा विधेयक आणा, कोणतंही विधेयक काढून टाका, राज्याचा नकाशा बदलून टाका, पाहिजे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करा असा प्रकार देशात सुरु आहे असा आरोप त्यांनी केला. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा