शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

देशाला वाचविण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल, हीच ती वेळ - सोनिया गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:52 IST

आज महिलांवर होणारे गुन्हे पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेर नगरी चौपट राजा असं वातावरण देशात आहे.

नवी दिल्ली - देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, देशाच्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती गंभीर झाल्याने आपण सर्वजण येथे आलो आहोत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. आपण घराबाहेर पडून त्याविरोधात आंदोलन करणे ही आपली जबाबदारी आहे. आज तीच वेळ आहे. देश वाचविण्यासाठी आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरुन केलं आहे. भारत बचाव रॅलीत त्या बोलत होत्या. 

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, तुम्ही बदलासाठी तयार आहात का? आज जेव्हा मी शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी बियाणे मिळत नाहीत, त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही. पिकांना वाजवी किंमत नाही. आमचे कामगार बांधव दिवसभर मजुरीमध्ये गुंतलेले असतात. ते हिवाळा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता काम करत राहतात. तरीही त्यांना 2 वेळची भाकरी मिळत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना बँक कर्ज देण्यास सक्षम नाहीत, संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आज आमचे तरुण अशा बेरोजगारीला तोंड देत आहे जी यापूर्वी कधीही आली नाही. नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर अंधार आहे असा घणाघात सोनियांनी केला. 

तसेच आज महिलांवर होणारे गुन्हे पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेर नगरी चौपट राजा असं वातावरण देशात आहे. सबका साथ सबका विकास कुठे आहे असा प्रश्न प्रत्येकजण करतोय. रोजगार कुठे गेला? अर्थव्यवस्था का नष्ट झाली? तुम्ही मला सांगा की काळा पैसा आणण्यासाठी आणलेल्या नोटाबंदीमुळे काळा पैसा का बाहेर पडला नाही याची चौकशी झाली पाहिजे. ते काळा पैसा कोणाकडे आहे? जीएसटीनंतरही मोदी सरकारची तिजोरी रिकामी का झाली? देशासाठी फायदेशीर असलेल्या कंपन्या कशा विकल्या जात आहेत आणि कोणाकडे? बँकांमध्येही सार्वजनिक पैसे सुरक्षित नाहीत असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले. 

त्याचसोबत मोदी-शहा म्हणतात हे अच्छे दिन आहेत. मात्र आजचे वातावरण असं झाले आहे की जेव्हा मनात येईल तेव्हा विधेयक आणा, कोणतंही विधेयक काढून टाका, राज्याचा नकाशा बदलून टाका, पाहिजे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करा असा प्रकार देशात सुरु आहे असा आरोप त्यांनी केला. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा