शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांनी निवडणूक लढवणे योग्य आहे का ?- सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 08:53 IST

सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गुन्ह्यांतील आरोपींना निवडणूक लढवण्यास देणे योग्य आहे का ?, त्यावर आम्ही निर्णय दिल्यास तो संसदेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप ठरेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आम्ही लक्ष्मण रेखा पार करू इच्छित नाही. तसेच अशा उमेदवारांना पक्षाच्या चिन्हापासून दूर केले जाऊ शकते का ?, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं अॅटर्नी जनरल यांना विचारला आहे. भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरिमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना अयोग्य ठरवण्याचा अधिकार कायदा तयार करणा-या संसदेला आहे. ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे. तसेच निवडणूक आयोग त्या उमेदवारांना पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास मज्जाव करू शकत नाही का ?, कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोग असा प्रशासकीय निर्णय घेऊ शकतो, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले, उमेदवार हा प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देतो. जोपर्यंत आरोपांमध्ये तो गुन्हेगार सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या उमेदवाराला दोषी समजणं योग्य आहे का ?, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय अप्रत्यक्षरीत्या उमेदवाराच्या विरोधातच नव्हे, तर राजकीय पक्षांवरही प्रतिबंध घालेल. त्यामुळे असा निर्णय घेणे योग्य नसल्याचं स्पष्टीकरण अॅटर्नी जनरल यांनी दिलं आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय