कालव्यातून आणि बोगद्यातून पाणी सोडणे शक्य
By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:33+5:302015-08-11T00:03:33+5:30
बबनराव शिंदे यांची माहिती: जळालेल्या उसाचे पंचनामे करा

कालव्यातून आणि बोगद्यातून पाणी सोडणे शक्य
ब नराव शिंदे यांची माहिती: जळालेल्या उसाचे पंचनामे करा सोलापूर: उजनी धरण मायनस ५० टक्के असताना पाणी सोडले आहे आता तर मायनस सात आहे़ शिवाय पुण्यातून दौंड आणि बंडगार्डन येथून सुमारे साडेचार हजार क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे़ त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तातडीने उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच सीना-माढा बोगद्यातून पाणी सोडले पाहिजे़ जलसंपदा मंत्र्यांनी यावर तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत आ़ बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले़आ़ श्िंादे सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते़ त्यावेळी त्यांनी विविध विषयावर पत्रकारांशी बातचित केली़ सध्या उजनीमध्ये पुरेसे पाणी आहे़ जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, पिके आणि पावसाने दिलेली ओढ याचा विचार करता तातडीने पाणी सोडले पाहिजे़ मंत्र्यांनी यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे़ सध्या धरणात ७२ टीएमसी पाणी आहे़ गेल्या आठ दिवसात उजनीमध्ये ३ टक्के पाणी वाढले आहे़ वरचे येत असलेले पाणीतरी सोडा अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले़ जिल्ातील २० टक्के ऊस पावसाअभावी जळाला आहे़ त्यामुळे त्याचे तातडीने पंचनामे करुन त्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे़ बोगद्यातून ९०० आणि कॅनॉलमधून ३२०० क्युसेक्स पाणी सोडावे, वाड्यावस्त्यांवर जिथे पाणी नाही अशा ठिकाणी तातडीने पाणी टँकर सुरू करावेत अशी आपली मागणी असल्याचे आ़ शिंदे म्हणाले़ चौकट़़़तुळशीचा टँकर बंद केलातुळशी गावात माझ्या कारखान्याच्या वतीने टँकरद्वारे गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू होता़ हे गाव आदर्श संसद ग्राममध्ये आहे़; मात्र गेल्या आठवड्यात माहिती घेतली असता या गावात पाणी मुबलक आहे त्यामुळे आता तुळशीमधील पाणी टँकर बंद केला असल्याचे आ़ बबनराव शिंदे यांनी सांगितले़ माढ्यात देखील मी तीन टँकर सुरू केले आहेत असे ते म्हणाले़