शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:35 IST

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेली कोंडी दूर करण्याचा आग्रह काँग्रेसने कायम ठेवल्यामुळे शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गुरुवारी काँग्रेसच्या याच ठाम भूमिकेमुळे सभागृहात कामकाज बंद पडले व त्यामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना त्यांचे सभागृहातील पहिले भाषणही करता आले नव्हते.संसदेचे कामकाज सध्या सुरू असते ते अधूनमधूनच. हे काही देशाच्या हिताचे नाही, असे नायडू म्हणाले. ते येथे इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर आणि इंटेग्रेटेड ट्रान्झिट कॉरीडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. नायडूम्हणाले, सर्वांना सामावून घेणाºया आर्थिक विकासाची भूमिका घेऊन भारताला जागतिक आर्थिक नेता बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.एकोप्याने राहण्याची संस्कृती-देशावर पूर्वी झालेल्या आक्रमणांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की या देशाची संस्कृती दहा हजार वर्षांची असून भारताने कोणावर कधी आक्रमण केल्याची नोंद नाही.आम्ही एकोप्याने राहू इच्छितो. आक्रमणापूर्वी जगाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) भारताचा वाटा २७ टक्के होता.लवकरात लवकर आर्थिक विकास ७.५ टक्क्यांच्या पलीकडे नेऊन दोन दोन आकडी होण्यासाठी आम्ही सगळ््यांनी काम केले पाहिजे, याचा विसर पडू नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूGovernmentसरकारParliamentसंसद