शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 07:35 IST

जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला बजावले होते.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राजकारण करू नये, असा निवडणूक आयोगाने दिलेला आदेश अत्यंत चुकीचा आहे. सरकारच्या धोरणावर टीका करणे हा विरोधकांचा हक्क आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी म्हटले आहे. 

जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला बजावले होते. अग्निपथ योजनेविषयी काँग्रेसने केलेल्या टीकेबद्दल निवडणूक आयोगाने हा इशारा दिला होता. त्याबद्दल पी. चिदंबरम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अग्निवीर प्रस्तावाला लष्कराचाही होता विरोधचिदंबरम म्हणाले की, अग्निवीर तयार करण्याच्या प्रस्तावाला लष्कराचाही विरोध होता. तरीही ही योजना केंद्र सरकारने राबविण्याचे ठरविले. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्यामुळे ही योजना रद्द करणे आवश्यक बनले आहे. 

नेमके काय म्हणायचेय?- आयोगाला नेमके काय म्हणायचे आहे? अग्निपथ या योजनेतून अग्निवीर तयार होतात. ते सरकारचे धोरण आहे.- त्यावर टीका करू नका, असे निवडणूक आयोगाला म्हणायचे आहे का? सरकारवर टीका करणे हा विरोधकांचा हक्क आहे. विरोधक सत्तेवर आले तर अग्निपथ योजना रद्द करण्यात येईल, असे सांगणेही चुकीचे नाही, असेही पी. चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग