शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

विमान प्रवासाचे भाडे कमी करणे सरकारच्या हातात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:41 IST

भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : गगनाला भिडणारे हवाई प्रवासाचे भाडे रोखणे सरकारच्या हातात नाही. या मुद्द्यावर सरकारने हात वर केले आहेत. यासाठी कोणत्याही कायद्यात तरतूद नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, जुलैपासून प्रवासभाडे कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

हवाई प्रवास भाड्यातील अंदाधुंद वाढ रोखण्याचे सरकारचे सर्व उपाय अयशस्वी ठरले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची देशांतर्गत विमान कंपन्यांशी अनेकदा चर्चा होऊनही हे शक्य झालेले नाही. जगातील सर्व देशांमध्ये एव्हिएशन कंपन्यांच्या भाड्यावर कोणत्याही सरकारचा दबाव अथवा नियंत्रण असत नाही. त्या कंपन्या स्वत:च भाडे निश्चित करतात, हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. हवाई प्रवास भाडे निश्चित करण्याच्या स्वातंत्र्याला त्या देशाच्या एव्हिएशन सेक्टरशी जोडून पाहिले जात आहे. 

भाडेवाढीची कारणेभारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. दरवर्षीच्या वाढीचा दर ३६.१० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी २०२२मध्ये जानेवारी ते मेपर्यंत हवाई प्रवाशांची संख्या ४६७.३७ लाख होती. ती २०२३च्या जानेवारी ते मेमध्ये वाढून ६३६.०७ लाख झाली आहे.गो एअर बंद होण्याचे कारणही भाडेवाढीमागे सांगितले जात आहे. ज्या मार्गांवर गो एअरची जास्त विमाने होती, तेथील हवाई प्रवास भाडे गगनाला भिडले आहे.

कारवाई करू शकत नाही- नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांचे संपूर्ण मंत्रालय हवाई प्रवास भाड्याच्या वाढीवर नजर ठेवून आहे. परंतु हवाई कंपन्यांना लगाम घालणे शक्य नाही. - यासाठी कोणताही कायदा परवानगी देत नाही. एकमेव सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाचीही सरकारने विक्री केली आहे. त्यामुळे आता सरकारचे कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. - बेजबाबदारपणा किंवा नियमांचे उल्लंघन केल्यावरून एअरलाइन्सविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. विमानांची उड्डाणे रोखली जाऊ शकतात. दंड लावला जाऊ शकतो. परंतु हवाई प्रवास भाड्याबाबत कोणतीही कारवाई करू शकत नाही.

पुढील महिन्यापासून विमान प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यतासर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते व जुलैपासून पुन्हा प्रवाशांची संख्या कमी होते. त्यामुळे सरकार व डीजीसीएच्या सर्व नजरा जुलै महिन्यावर आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, पुढील महिन्यापासून विमान प्रवास भाडे काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.

विमान कंपन्यांमध्ये नफा वसुलीची स्पर्धा एवढी वाढली आहे की, भाड्यात ३०० ते ४०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एकेकाळी कंपन्या स्वस्त प्रवासाची ऑफर देत होत्या. परंतु तो काळ आता संपताना दिसत आहे.

मागील महिन्यात ८१.१० लाख प्रवाशांना हवाई सफर करवून इंडिगो सर्वांत जास्त प्रवाशांना हवाई सफर घडवणारी कंपनी झाली आहे. देशात हवाई प्रवासातील ६१.४ टक्के हिस्सा मागील महिन्यात मेमध्ये इंडिगोने प्राप्त केला आहे. 

टॅग्स :airplaneविमान