शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

विमान प्रवासाचे भाडे कमी करणे सरकारच्या हातात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:41 IST

भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : गगनाला भिडणारे हवाई प्रवासाचे भाडे रोखणे सरकारच्या हातात नाही. या मुद्द्यावर सरकारने हात वर केले आहेत. यासाठी कोणत्याही कायद्यात तरतूद नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, जुलैपासून प्रवासभाडे कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

हवाई प्रवास भाड्यातील अंदाधुंद वाढ रोखण्याचे सरकारचे सर्व उपाय अयशस्वी ठरले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची देशांतर्गत विमान कंपन्यांशी अनेकदा चर्चा होऊनही हे शक्य झालेले नाही. जगातील सर्व देशांमध्ये एव्हिएशन कंपन्यांच्या भाड्यावर कोणत्याही सरकारचा दबाव अथवा नियंत्रण असत नाही. त्या कंपन्या स्वत:च भाडे निश्चित करतात, हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. हवाई प्रवास भाडे निश्चित करण्याच्या स्वातंत्र्याला त्या देशाच्या एव्हिएशन सेक्टरशी जोडून पाहिले जात आहे. 

भाडेवाढीची कारणेभारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. दरवर्षीच्या वाढीचा दर ३६.१० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी २०२२मध्ये जानेवारी ते मेपर्यंत हवाई प्रवाशांची संख्या ४६७.३७ लाख होती. ती २०२३च्या जानेवारी ते मेमध्ये वाढून ६३६.०७ लाख झाली आहे.गो एअर बंद होण्याचे कारणही भाडेवाढीमागे सांगितले जात आहे. ज्या मार्गांवर गो एअरची जास्त विमाने होती, तेथील हवाई प्रवास भाडे गगनाला भिडले आहे.

कारवाई करू शकत नाही- नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांचे संपूर्ण मंत्रालय हवाई प्रवास भाड्याच्या वाढीवर नजर ठेवून आहे. परंतु हवाई कंपन्यांना लगाम घालणे शक्य नाही. - यासाठी कोणताही कायदा परवानगी देत नाही. एकमेव सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाचीही सरकारने विक्री केली आहे. त्यामुळे आता सरकारचे कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. - बेजबाबदारपणा किंवा नियमांचे उल्लंघन केल्यावरून एअरलाइन्सविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. विमानांची उड्डाणे रोखली जाऊ शकतात. दंड लावला जाऊ शकतो. परंतु हवाई प्रवास भाड्याबाबत कोणतीही कारवाई करू शकत नाही.

पुढील महिन्यापासून विमान प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यतासर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते व जुलैपासून पुन्हा प्रवाशांची संख्या कमी होते. त्यामुळे सरकार व डीजीसीएच्या सर्व नजरा जुलै महिन्यावर आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, पुढील महिन्यापासून विमान प्रवास भाडे काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.

विमान कंपन्यांमध्ये नफा वसुलीची स्पर्धा एवढी वाढली आहे की, भाड्यात ३०० ते ४०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एकेकाळी कंपन्या स्वस्त प्रवासाची ऑफर देत होत्या. परंतु तो काळ आता संपताना दिसत आहे.

मागील महिन्यात ८१.१० लाख प्रवाशांना हवाई सफर करवून इंडिगो सर्वांत जास्त प्रवाशांना हवाई सफर घडवणारी कंपनी झाली आहे. देशात हवाई प्रवासातील ६१.४ टक्के हिस्सा मागील महिन्यात मेमध्ये इंडिगोने प्राप्त केला आहे. 

टॅग्स :airplaneविमान