शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विमान प्रवासाचे भाडे कमी करणे सरकारच्या हातात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 08:41 IST

भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : गगनाला भिडणारे हवाई प्रवासाचे भाडे रोखणे सरकारच्या हातात नाही. या मुद्द्यावर सरकारने हात वर केले आहेत. यासाठी कोणत्याही कायद्यात तरतूद नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, जुलैपासून प्रवासभाडे कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे.

हवाई प्रवास भाड्यातील अंदाधुंद वाढ रोखण्याचे सरकारचे सर्व उपाय अयशस्वी ठरले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची देशांतर्गत विमान कंपन्यांशी अनेकदा चर्चा होऊनही हे शक्य झालेले नाही. जगातील सर्व देशांमध्ये एव्हिएशन कंपन्यांच्या भाड्यावर कोणत्याही सरकारचा दबाव अथवा नियंत्रण असत नाही. त्या कंपन्या स्वत:च भाडे निश्चित करतात, हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. हवाई प्रवास भाडे निश्चित करण्याच्या स्वातंत्र्याला त्या देशाच्या एव्हिएशन सेक्टरशी जोडून पाहिले जात आहे. 

भाडेवाढीची कारणेभारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. दरवर्षीच्या वाढीचा दर ३६.१० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी २०२२मध्ये जानेवारी ते मेपर्यंत हवाई प्रवाशांची संख्या ४६७.३७ लाख होती. ती २०२३च्या जानेवारी ते मेमध्ये वाढून ६३६.०७ लाख झाली आहे.गो एअर बंद होण्याचे कारणही भाडेवाढीमागे सांगितले जात आहे. ज्या मार्गांवर गो एअरची जास्त विमाने होती, तेथील हवाई प्रवास भाडे गगनाला भिडले आहे.

कारवाई करू शकत नाही- नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व त्यांचे संपूर्ण मंत्रालय हवाई प्रवास भाड्याच्या वाढीवर नजर ठेवून आहे. परंतु हवाई कंपन्यांना लगाम घालणे शक्य नाही. - यासाठी कोणताही कायदा परवानगी देत नाही. एकमेव सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाचीही सरकारने विक्री केली आहे. त्यामुळे आता सरकारचे कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. - बेजबाबदारपणा किंवा नियमांचे उल्लंघन केल्यावरून एअरलाइन्सविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. विमानांची उड्डाणे रोखली जाऊ शकतात. दंड लावला जाऊ शकतो. परंतु हवाई प्रवास भाड्याबाबत कोणतीही कारवाई करू शकत नाही.

पुढील महिन्यापासून विमान प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यतासर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते व जुलैपासून पुन्हा प्रवाशांची संख्या कमी होते. त्यामुळे सरकार व डीजीसीएच्या सर्व नजरा जुलै महिन्यावर आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, पुढील महिन्यापासून विमान प्रवास भाडे काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.

विमान कंपन्यांमध्ये नफा वसुलीची स्पर्धा एवढी वाढली आहे की, भाड्यात ३०० ते ४०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. एकेकाळी कंपन्या स्वस्त प्रवासाची ऑफर देत होत्या. परंतु तो काळ आता संपताना दिसत आहे.

मागील महिन्यात ८१.१० लाख प्रवाशांना हवाई सफर करवून इंडिगो सर्वांत जास्त प्रवाशांना हवाई सफर घडवणारी कंपनी झाली आहे. देशात हवाई प्रवासातील ६१.४ टक्के हिस्सा मागील महिन्यात मेमध्ये इंडिगोने प्राप्त केला आहे. 

टॅग्स :airplaneविमान