शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:49 IST

बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एससी, एसटी समुहाचा अपमान करण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने अनेकदा पाहिले आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.  

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत सर्व खासदारांनी आंबेडकरांचा फोटो हातात घेत संसद भवनात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या मुद्द्यावरून विरोधकांनी अमित शाह यांना घेरले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलंय की, एका पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा संपवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला. संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे आणि एससी एसटी समुहाकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला. शाह यांनी दिलेल्या तथ्यामुळे काँग्रेसची बोलती बंद झाली. त्यामुळेच आज ते नौटंकी करत आहेत. हे दु:खद असले तरी लोकांना सत्य माहिती आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आज आम्ही जे काही आहोत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहोत. आमच्या सरकारने मागील एका दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता मेहनत घेतली आहे. कुठलेही क्षेत्र घ्या, मग २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे असेल, एससी, एसटी कायदा मजबूत करणे असेल. आमच्या सरकारने स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना यासारखे अनेक कार्यक्रम केले. या सर्व योजनांमुळे गरीब आणि वंचित घटकांना न्याय दिला आहे असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

दरम्यान, काँग्रेसने एकदा नव्हे दोनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला. पंडित नेहरू यांनी त्यांच्याविरोधात प्रचार करत आंबेडकरांचा पराभव प्रतिष्ठेचा केला होता. काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्नही देण्यास नकार दिला होता. त्यांचा फोटो संसदेत सन्मानाने लावण्यासही काँग्रेसची इच्छा नव्हती. जर काँग्रेसला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटत असेल की त्यांची चुकीची कामे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान लपवू शकतात तर ही त्यांची मोठी चूक आहे. घराणेशाहीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संपवण्याचा आणि एससी, एसटी समुहाचा अपमान करण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला हे भारतातील जनतेने अनेकदा पाहिले आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधी