शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

By मोरेश्वर येरम | Updated: March 16, 2023 12:36 IST

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे.

नवी दिल्ली

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत आतापर्यंतच्या युक्तिवादात सुटलेले मुद्दे मांडण्याची संधी कपिल सिब्बल यांना मिळाली आहे. 

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करायची असते तेव्हा गटबाजीला जागा नसते. आता जर सर्व शिवसेना-भाजप युती असती तर राज्यपालांनी बहुमत चाचणी घेणं योग्य ठरलं असतं. पण यात शिवसेना स्वत:हून तयार होणं गरजेचं आहे. पक्षात आया राम गया राम तत्त्व आम्ही मानत नाही. कारण लोकशाहीसाठी ते घातक आहे. त्यामुळे राज्यपालांकडे मांडण्यात आलेला प्रस्ताव घटनात्मक कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असण्याशिवाय आमदाराला कोणतीही ओळख नसते. घटनेतील दहाव्या सूचीचं सोडून द्या. पण पक्षातील दुफळीच्या आधारे राज्यपाल बहुमत चाचणी कशी बोलावू शकतात? ती युतीच्या आधारावर बोलावणं अपेक्षित आहे, असंही कपिल सिब्बल म्हणाले.

सिब्बल यांच्या युक्तिवादावर खंडपीठातील न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. "तुमचा युक्तिवाद कधीकधी धोकादायक देखील ठरू शकतो. कारण पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक आहे. यामुळे पक्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकत नाही आणि अनेकदा एकच कुटुंब पक्ष चालवतो", असं न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले. 

राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हकपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरच बोट ठेवलं. शिवसेनेच्या बहुमताच्या दाव्यावर राज्यपालांनी आपला निर्णय घेतला. पण राज्यपाल कोणत्या संवैधानिक आधारावर एखाद्या गटाला, मग तो अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्य असो बहुमत चाचणीसाठीची मान्यता  देऊ शकतात?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना