शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

By मोरेश्वर येरम | Updated: March 16, 2023 12:36 IST

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे.

नवी दिल्ली

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत आतापर्यंतच्या युक्तिवादात सुटलेले मुद्दे मांडण्याची संधी कपिल सिब्बल यांना मिळाली आहे. 

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करायची असते तेव्हा गटबाजीला जागा नसते. आता जर सर्व शिवसेना-भाजप युती असती तर राज्यपालांनी बहुमत चाचणी घेणं योग्य ठरलं असतं. पण यात शिवसेना स्वत:हून तयार होणं गरजेचं आहे. पक्षात आया राम गया राम तत्त्व आम्ही मानत नाही. कारण लोकशाहीसाठी ते घातक आहे. त्यामुळे राज्यपालांकडे मांडण्यात आलेला प्रस्ताव घटनात्मक कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असण्याशिवाय आमदाराला कोणतीही ओळख नसते. घटनेतील दहाव्या सूचीचं सोडून द्या. पण पक्षातील दुफळीच्या आधारे राज्यपाल बहुमत चाचणी कशी बोलावू शकतात? ती युतीच्या आधारावर बोलावणं अपेक्षित आहे, असंही कपिल सिब्बल म्हणाले.

सिब्बल यांच्या युक्तिवादावर खंडपीठातील न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. "तुमचा युक्तिवाद कधीकधी धोकादायक देखील ठरू शकतो. कारण पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक आहे. यामुळे पक्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकत नाही आणि अनेकदा एकच कुटुंब पक्ष चालवतो", असं न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले. 

राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हकपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरच बोट ठेवलं. शिवसेनेच्या बहुमताच्या दाव्यावर राज्यपालांनी आपला निर्णय घेतला. पण राज्यपाल कोणत्या संवैधानिक आधारावर एखाद्या गटाला, मग तो अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्य असो बहुमत चाचणीसाठीची मान्यता  देऊ शकतात?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना