शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

धर्माच्या नावे खून करणे अक्षम्य; पुणे खून खटल्यातील तिघांचा जामीन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:52 IST

नवी दिल्ली : एखादी व्यक्ती ठराविक धर्माची आहे म्हणून अन्य धर्माच्या जमावाने हल्ला करून तिचा खून करणे कदापि समर्थ नीयठरू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले असून चार वर्षांपूर्वी पुण्यात हडपसर येथे झालेल्या शेख मोहसीन या तरुणाच्या खुनाच्या आरोपावरून अटक केलेल्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला ...

नवी दिल्ली : एखादी व्यक्ती ठराविक धर्माची आहे म्हणून अन्य धर्माच्या जमावाने हल्ला करून तिचा खून करणे कदापि समर्थ नीयठरू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले असून चार वर्षांपूर्वी पुण्यात हडपसर येथे झालेल्या शेख मोहसीन या तरुणाच्या खुनाच्या आरोपावरून अटक केलेल्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला आहे.गणेश ऊर्फ रणजीत शंकर यादव, विजय गंभीरे आणि अजय दिलिप लालगे या तीन आरोपींना उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १२ जानेवारीस जामीन मंजूर केला होता. त्याविरुद्ध मयत मोहसीनचा धाकटा भाऊ मोबिन शेख तसेच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपीले केली होती. न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ती मंजूर केली. खंडपीठाचा ९ फेब्रुवारीचा निकाल गुरुवारी उपलब्ध झाला. या निकालानुसार तिन्ही आरोपींना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. त्यांना शुक्रवारी उच्च न्यायालयापुढे हजर केले जाईल. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जांवर फेरसुनावणी घेऊन नव्याने निकाल द्यायचा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची विटंबना झाल्यानंतर २ जून २०१४ रोजी रात्री हडपसर येथे हिंदू राष्ट्र सेनेने बैठक घेतली होती व ही बिटंबना करणाºयांचा बदला घेण्याचे जाहीर केले. ही बैठक संपून जेमतेम अर्ध्या तासानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीन शेखवर हॉकी स्टिक, बॅट व दगडांनी हल्ला करून त्यास ठार मारले होते. मोहसीन शेख एका मित्रासोबत स्कूटरवरून जेवणासाठी चालला होता. त्याने हिरव्आ रंगाचा शर्ट घातला होता व दाढी वाढविलेली होती. त्याच्या या बाह्यरुपावरूनच तो मुस्लिम असल्याचे ओळखून हिंदू राष्ट्र सेनेच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता.उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्या. मृदुला भाटकर यांनी या तीन आरोपींना जामीन देताना प्रामुख्याने असे कारण दिले होते: निष्पाप मोहसीनवर हल्ला करण्याचे आरोपींना पूर्ववैमनस्यासारखे काही कारण नव्हते. मोहसीन भिन्न धर्माचा होता एवढीच काय ती त्याची चूक होती. माझ्या मते ही आरोपींच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आरोपींची धर्माच्या नावाने डोकी भडकावली गेली व त्या भरात त्यांनी हा खून केला. सर्वोच्च न्यायालयाने ही कारणमीमांसा सर्वस्वी अमान्य केली.हायकोर्टाची भाषा चुकीचीउच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिलेल्या निकालात वापरलेली चुकीची आणि गैरसमज निर्माण होऊ शकतील, अशी आहे. असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, देशात विविध धर्मांचे लोक राहतात याचे भान असलेले न्यायालय दोन भिन्न धर्मियांशी संबंधित प्रकरणात ज्यामुळे त्यापैकी एका समाजवर्गा विषयी पूर्वग्रह ध्वनित होईल, असे भाष्य करू शकत नाही.कदाचित गा निकाल देताना संबंधित न्यायाधीशाच्या मनात असे नसेलही पण त्यांनी जे शब्द वापरले आहेत त्यावरून असा समज निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय