शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण हा मुद्दा चर्चेत नव्हताच; काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 07:07 IST

काँग्रेसची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक : संघटनात्मक विषयावर चर्चा

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या शुक्रवारी येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे कोण असेल हा विषय नव्हता. प्रसारमाध्यमांत मात्र या उलट बातम्या होत्या.  या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संघटना प्रभारी) के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

या बैठकीत अध्यक्षपदाचा विषय चर्चेत होता का, असे विचारले असता पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, ‘नाही, त्याची चर्चा झाली नाही. बैठक महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर घेण्यात आली होती.’ राज्यात स्वबळावर लढणार का, यावर पाटील म्हणाले की, तो विषय २०२४ मध्ये समयोचित आहे (२०२४ मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणूक आहे).

राज्यात महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये सत्तेचे वाटप जसे ठरले आहे त्यानुसार अध्यक्षपद काँग्रेसला दिले गेले आहे आणि काँग्रेसचे नाना पटोले हे अध्यक्ष बनले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ते पद सोडले व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेव्हापासून पक्षाला त्यांच्या वारसावर निर्णय घेता आलेला नाही. याशिवाय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष असेल की नाही हेदेखील स्पष्ट नाही. राज्य आणि मुंबई प्रांतीय काँग्रेसचा भर ‘एकला चलो रे’ आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा यावर असताना अखिल भारतीय काँग्रेस समिती त्याला फार महत्त्व देत नाही. 

भाजप निवडणूक जिंकणे अशक्य

‘जर आम्ही (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र राहिलो, तर बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे आणि इतर महानगरपालिकांची आगामी निवडणूक भाजपला जिंकता येणार नाहीत,’  असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. हा नेता म्हणाला की, ‘पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला याची जाणीव आहे.’

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी